स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

कांदा निर्यात बंदी : ‘या निर्णयाचा पाकिस्तानसह इतर कांदा निर्यात करणाऱ्या देशांना फायदा होईल’, कांदा निर्यात बंदीवर शरद पवारांची प्रतिक्रीया

Team Sthairya by Team Sthairya
September 15, 2020
in Uncategorized

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१५: कांद्याच्या दरांत वाढीची शक्यता पाहून केंद्र सरकारने सोमवारी कांद्याच्या निर्यातीवर अमर्याद कालावधीसाठी बंदी घातली आहे. या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत संसद अधिवेशनादरम्यान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करुन शेतकरी हिताचा निर्णय घ्या, असे मत व्यक्त केले आहे.

याबाबत शरद पवार म्हणाले की, ‘केंद्र सरकारने आकस्मिकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. यामुळे महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक बेल्टमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली व विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याशी काल रात्री संपर्क करून केंद्र सरकारला या प्रतिक्रियेबाबत अवगत करण्याची विनंती केली आहे. या विनंतीला अनुसरुन पियुष गोयल यांनी सांगितले की, कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयातर्फे बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर आला आहे.’

‘भारतातून निर्यात होणाऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे व आपण सातत्याने कांदा निर्यात करत आलो आहोत. पण केंद्र सरकारच्या अशा आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला मोठा धक्का बसतो. या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात भारत हा निर्यातीच्या बाबतीत एक बेभरवशाचा देश आहे अशी प्रतिमा बनण्याची शक्यता बळावते. ती आपल्याला परवडणारी नाही. या परिस्थितीचा अनाठायी फायदा पाकिस्तान आणि इतर जे कांदा निर्यातदार देश आहेत त्यांना मिळतो.

‘या निर्णयाचा पाकिस्तान आणि इतर कांदा निर्यात करणाऱ्या देशांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. हे सर्व पाहता मी पियुष गोयल यांना कांद्याच्या निर्यातीवरील बंदीचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. या संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय या तिन्ही मंत्रालयांशी चर्चा करून आम्ही या निर्यातबंदीचा फेरविचार करू व जर एकमत झाल्यास याबाबतीत पुनर्निर्णय घेऊ. असे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केले आहे,’ अशी माहिती शरद पवारांनी दिली.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

Tags: शेती विषयक
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील 898 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 35 नागरिकांचा मृत्यु

Next Post

राज्यपालांची भेट : आता जाहीरच करतो, मी आरएसएस आणि भाजपसोबत आहे! राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माजी नौदल अधिकारी मदन शर्मा

Next Post

राज्यपालांची भेट : आता जाहीरच करतो, मी आरएसएस आणि भाजपसोबत आहे! राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माजी नौदल अधिकारी मदन शर्मा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,029 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

फलटणमध्ये नेहमीप्रमाणे ‘लॉक डाऊन’; अफवांवर विश्वास ठेवू नका; प्रांताधिकरी डॉ. शिवाजी जगताप यांचे आवाहन

April 19, 2021

Phaltan : दुःखद निधन

April 19, 2021

साताऱ्यातील ओझर्डे येथील जवान सोमनाथ अरविंद तांगडे यांच्यावर अंत्यसंस्कार

April 19, 2021

खासदार संजय राऊत गुंफणार महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ३१ वे पुष्प

April 19, 2021

फलटण शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची करण्यात आली कोरोना चाचणी; ५० पैकी ७ रुग्ण आले पॉझिटिव्ह

April 19, 2021

फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातून कोरोना बाधित रुग्णाचे पलायन; गचाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर

April 19, 2021

पत्रकार रफिक मुल्ला यांना पितृशोक

April 18, 2021

अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

April 18, 2021

शालिनीताई मेघे रुग्णालयाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट

April 18, 2021

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा वाढविणार – पालकमंत्री उदय सामंत

April 18, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.