स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

अमृत महाआवास अभियानातील पुरस्काराचे डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते वितरण

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 15, 2023
in प्रादेशिक

दैनिक स्थैर्य । दि. १५ जानेवारी २०२३ । सांगली । जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात आलेल्या अमृत महाआवास अभियान ग्रामीण 2021-22 पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात कामगार मंत्री आणि पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते करण्यात आले.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमनताई पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, प्रकल्प संचालक दिपक चव्हाण यांच्यासह गटविकास अधिकारी व पुरस्कार विजेते उपस्थित होते.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट तालुका पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांक कवठेमहांकाळ तालुका, द्वितीय क्रमांक खानापूर तालुका, तृतीय क्रमांक आटपाडी तालुका यांना वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांक खानापूर तालुक्यातील हिवरे ग्रामपंचायत, द्वितीय क्रमांक शिराळा तालुक्यातील पाडळेवाडी ग्रामपंचायत, तृतीय क्रमांक शिराळा तालुक्यातील येळापुर ग्रामपंचायत यांना वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्कारामध्ये खानापूर तालुक्यातील लेंगरे जिल्हा परिषद गट, द्वितीय क्रमांक मिरज तालुक्यातील आरग जिल्हा परिषद गट, तृतीय क्रमांक वाळवा तालुक्यातील चिकुर्डे जिल्हा परिषद गट यांना वितरित करण्यात आला.

राज्य पुरस्कृत योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट तालुका पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांक शिराळा तालुका, द्वितीय क्रमांक खानापुर व कवठेमहांकाळ यांना विभागून व तृतीय क्रमांक पलुस तालुका यांना वितरित करण्यात आला.  ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव, द्वितीय क्रमांक कवठेमहांकाळ तालुक्यातील विठुरायाचीवाडी, तृतीय क्रमांक खानापुर तालुक्यातील आळसंद यांना वितरित करण्यात आला.  ग्रामीण सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्करामध्ये प्रथम क्रमांक खानापुर तालक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गट, द्वितीय क्रमांक शिराळा तालुक्यातील मांगले जिल्हा परिषद गट, तृतीय क्रमांक वाळवा तालुक्यातील वाटेगाव जिल्हा परिषद गट यांना वितरित करण्यात आले.


Previous Post

जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी प्रयत्न – पालकमंत्री शंभूराज देसाई

Next Post

महिला व बालविकास, पर्यटन क्षेत्र आणि कौशल्य विकासासाठी इंडो कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्ससोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी – मंत्री मंगलप्रभात लोढा  

Next Post

महिला व बालविकास, पर्यटन क्षेत्र आणि कौशल्य विकासासाठी इंडो कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्ससोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी – मंत्री मंगलप्रभात लोढा  

ताज्या बातम्या

काँग्रेस नेते महादेव सुळे यांचा भाजपात प्रवेश

January 28, 2023

राजभवन येथील ‘अटल उद्यान’ आणि ‘जैव विविधता’ प्रकल्पाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

January 28, 2023

कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

January 28, 2023

छत्रपती शिवाजी कॉलेजेमध्ये शहीद वीर व राष्ट्रनिर्मात्याना मानवंदना

January 28, 2023

बौद्धजन पंचायत समितीच्या गट क्र. २२ च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

January 28, 2023

“तुम्ही तुमच्या मुलाची जागा वाचवली तरी पुरे”; संजय राऊतांचे CM एकनाथ शिंदेंना आव्हान

January 28, 2023

कीर्तन परंपरेचा आजच्या काळात नव्याने अभ्यास होणे गरजेचे – प्रा. डॉ. धनंजय होनमाने

January 28, 2023

भारतीय बौद्ध महासभा अंकुर बौद्ध विहार शाखेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

January 28, 2023

प्रजासत्ताक दिनी आटपाडीत प्रथमच सागर यांनी केली सत्यशोधक वास्तू पूजन

January 28, 2023

पारसिक बोगद्यामुळे प्रवासातील वेळेत बचत होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

January 28, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!