महिलेचा विनयभंग


स्थैर्य, सातारा, दि. ०५ : येथील प्रतापगंज पेठेत रात्री साडेआठच्या सुमारास कामावरून घरी परतत असणार्‍या महिलेचा अज्ञाताने विनयभंग केला.

याबाबत पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संबंधित महिला दि. 3 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कामावरून घरी येत होती. यावेळी प्रतापगंज पेठेतील महावितरण कार्यालयाजवळ ती आली असता अज्ञाताने तिचा हात व गळा पकडून काळोखात ओढून नेण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी अज्ञातावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार शिंदे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!