• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

मंत्री महोदयांनी सुद्धा पंढरपूरला न येता स्थानिक अधिकार्‍यांद्वारे प्रातिनिधिक पूजा करावी : अक्षय महाराज भोसले

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 22, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, फलटण, दि. २१ : आषाढी वारीनंतर आता कार्तिकिलाही वारकरी व भक्तांना पंढरपूरात प्रवेश न देण्याची शासनाची भूमिका असून त्याप्रमाणे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येत असताना मंत्री महोदयांनी सुद्धा पंढरपूरला न येता स्थानिक अधिकार्‍यांद्वारे प्रातिनिधिक पूजा करावी अशी अपेक्षा वारकरी सांप्रदाय युवा मंच राज्याध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी व्यक्त केली आहे.

 

वारकरी सांप्रदाय कायमच सरकारी यंत्रणेला सहकार्य करत आला आहे. मात्र सरकार त्याच्याकडे गांभीर्याने पहात नाही, शासनाने किमान प्रत्येक मठात 30 ते 50 वारकर्‍यांना सर्व कोरोना प्रतिबंधात्मक काळजी घेत परवानगी निवासाची परवानगी द्यावी अशी मागणी करताना सध्या पदवीधर मतदार संघातील निवडणूकीबाबतीत राज्यभर प्रत्येक राजकीय पक्षांच्या बैठका सुरु आहेत. शेकडो कार्यकर्ते उपस्थित असतात तेंव्हा शासन यावर कसे अंकुश ठेवत नाही असा सवाल अक्षय महाराज भोलसे यांनी उपस्थित केला आहे. 

वारी व अध्यात्मिक काही आले की नियम लागू होतात, अशी दुटप्पी भावना सरकारने ठेऊ नये, आम्ही कायम सहकार्य करत आलो आहोत पुढे ही करणार आहोत असे सांगून संत गाडगेबाबा कधीच मंत्रालयाची पायरी चढले नव्हते. मंत्री महोदय त्यांच्या भेटीस मंत्रालयाबाहेर येऊन थांबत असत, एकेकाळी इतका आदर साधू संतांविषयी होता. आतां मात्र कुठलाच राजकीय पक्ष किंवा मायबाप सरकार प्रत्येक अध्यात्मिक गोष्टींकडे कानाडोळा करत आहे. आज सरसकट मॉल व मार्केटस सुरु आहेत तिथे कुठल्याही प्रकारची दक्षता न घेता हजारो लोक वावरतात तेंव्हा शासन तेथे निर्बंध लावत नाही. वारकरी सांप्रदाय येत्या काळात आपली नाराजी दाखवून देईल यात शंका नाही.

पोलिसांबाबत अत्यंत आदर बाळगत सांगू इच्छितो की, वारी बंदोबस्तासाठी1800 पोलीस तैनात केले आहेत त्याऐवजी जर किमान 1500 वारकरी येऊ दिले तर अडचण काय? निष्ठेने परंपरा व नियम सांभाळणारे वारकर्‍यांना आदराने पंढरपूरात येऊ द्यावे अन्यथा जसे वारकरी घरी आहेत तसे मंत्री महोदयांनी सुद्धा घरुनच पूजा करावी अशी मागणी वारकरी सांप्रदाय युवा मंचचे राज्याध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी केली आहे.


Tags: फलटण
Previous Post

तालुक्यातील ओबीसी समाजातील प्रमुख पदाधिकारी/कार्यकर्त्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक

Next Post

अ. भा. शिक्षक संघ फलटण शाखा पदाधिकारी नियुक्त्या जाहीर : नव नियुक्तांचे अभिनंदन

Next Post

अ. भा. शिक्षक संघ फलटण शाखा पदाधिकारी नियुक्त्या जाहीर : नव नियुक्तांचे अभिनंदन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्थानक योजनेत फलटणचा समावेश : रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव; खासदार रणजितसिंह यांच्या प्रयत्नांना यश

मार्च 29, 2023

ग्रामदैवत फलटण, पुरातन श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहण हे फलटणच्या परंपरेला साजेसे काम : आ.श्रीमंत रामराजे

मार्च 29, 2023

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी ‘आयएफसी’ सोबतचा भागिदारी करार उपयुक्त ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे प्रतिपादन

मार्च 29, 2023

प्रवचने – पैशाच्या आसक्तित राहू नये

मार्च 29, 2023

कमी पाण्यात जास्तीच्या उत्पन्नाची हमी देणारी ‘प्रति थेंब अधिक पीक योजना’

मार्च 29, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मार्च 29, 2023

कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे संजय कोळी यांचे दीर्घ आजाराने निधन

मार्च 29, 2023

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात सातारा जिल्हा राज्यात अव्वल

मार्च 29, 2023

वझीरएक्सने पारदर्शकता अहवालाची चौथी आवृत्ती सादर केली

मार्च 29, 2023

मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पाचे काम आठ दिवसात मार्गी लावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

मार्च 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!