• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

प्रवास होणार सुखकर! मल्हारपेठ-पंढरपूरसह मायणी रोड टकाटक, त्रासलेल्या नागरिकांना दिलासा

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 14, 2020
in Uncategorized

स्थैर्य,मायणी,दि १४: बायपास रस्त्यावर कंत्राटदाराने मुरूम टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे व निर्माण झालेल्या दलदलीने त्रासलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. 

येथील बाजारपेठेतून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर रोडच्या दर्जोन्नतीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे लोकवर्गणीतून तयार करण्यात आलेल्या बायपास रोडने वाहतूक वळवण्यात आली आहे. त्या रस्त्यावर खडीकरणही करण्यात आलेले नाही. परिणामी, अवजड वाहतुकीमुळे ठिकठिकाणी रोड खचत आहे. मोठे खड्डे पडत आहेत. रस्त्याकडेलाच नागरिकांनी सांडपाणी सोडलेले आहे. सार्वजनिक काही गटाराचे पाणी सुद्धा त्या रस्त्यावर येते. त्यामुळे रस्त्यावर सतत दलदल असते. त्या दलदलीतून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. अचानक दलदलीत फसून दुचाकी चालकांना अपघात झाले आहेत. रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे. 

दरम्यान, येथील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने रस्ता वाहतुकीस बंद करण्यापूर्वी लोकांची वाहतुकीची गैरसोय टाळणे आवश्‍यक होते. तात्पुरत्या बायपास रस्त्यावर किमान मुरमीकरण व खडीकरण करणे आवश्‍यक होते. मात्र, त्यांनी बेफिकिरीने व मनमानी करत त्याकडे कानाडोळा केला. ग्रामपंचायतीसह स्थानिक नेते व गावगाड्यातील प्रमुख कार्यकर्तेही मूग गिळून गप्प बसले होते. त्यांनी आवश्‍यक पाठपुरावा केला नाही. बायपास रस्त्यावर किमान मुरूम टाकण्याची मागणी लोकांनी ग्रामपंचायतीकडे लावून धरली होती. त्या परिस्थितीत “मायणीत बायपास रोडच्या ऑपरेशनची गरज’ या मथळ्याखाली “सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी संबंधित कंत्राटदाराचे कान उपटले. तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची आग्रही मागणी केली. त्यामुळे कंत्राटदाराने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतल. रस्त्यावर मुरूम टाकण्यास सुरुवात केली आहे. ते काम सुरू होताच नागरिकांनी कामाच्या छायाचित्रांसह सोशल मीडियावर कामाचे श्रेय देत “सकाळ’ला धन्यवाद दिले.


Tags: राज्यसातारा
Previous Post

चला बालदिनाची मजा लुटायला! कोयना धरणासह नेहरू उद्यान पर्यटकांसाठी खुले

Next Post

लोंगेवाला पोस्टवरून मोदींचा चीन आणि पाकिस्तानला इशारा, म्हणाले – …तर चोख प्रत्युत्तर मिळेल

Next Post

लोंगेवाला पोस्टवरून मोदींचा चीन आणि पाकिस्तानला इशारा, म्हणाले - ...तर चोख प्रत्युत्तर मिळेल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी ‘आयएफसी’ सोबतचा भागिदारी करार उपयुक्त ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे प्रतिपादन

मार्च 29, 2023

प्रवचने – पैशाच्या आसक्तित राहू नये

मार्च 29, 2023

कमी पाण्यात जास्तीच्या उत्पन्नाची हमी देणारी ‘प्रति थेंब अधिक पीक योजना’

मार्च 29, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मार्च 29, 2023

कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे संजय कोळी यांचे दीर्घ आजाराने निधन

मार्च 29, 2023

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात सातारा जिल्हा राज्यात अव्वल

मार्च 29, 2023

वझीरएक्सने पारदर्शकता अहवालाची चौथी आवृत्ती सादर केली

मार्च 29, 2023

मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पाचे काम आठ दिवसात मार्गी लावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

मार्च 29, 2023

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराचे वितरण

मार्च 29, 2023

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना

मार्च 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!