• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

“महाराष्ट्राला मुख्यमंत्री नाहीत, ते मख्खमंत्री आहेत” – संजय राऊत

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
मार्च 17, 2023
in देश विदेश

दैनिक स्थैर्य । दि. १७ मार्च २०२३ । मुंबई । अमृता फडणवीस यांना धमकी दिल्याप्रकरणी काल एका तरूणीला अटक करण्यात आली. तिचे वडील कुख्यात फरार बुकी व उल्हासनगरचा माजी नगरसेवक अनिल जयसिंघानीवरील पोलिस कारवाई टाळण्यासाठी त्या तरूणीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटीच्या लाचेची ऑफर दिल्याची घटना घडली. घडलेल्या प्रकारानंतर मलबारहिल पोलिसांनी गुरुवारी जयसिंघानी याची मुलगी अनिष्काला बेड्या ठोकल्या. या प्रकरणावर आज शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘मख्खमंत्री’ असा करत त्यांची खिल्ली उडवली.

“राज्यात सध्या जो काही प्रकार सुरू आहे त्यावरून असे दिसून येते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोणावरच वचक नाही. कारण या राज्याला मुख्यमंत्री नाहीच, या राज्याला एक ‘मख्खमंत्री’ आहे. राज्यात सगळं मख्खपणे चाललं आहे. मुख्यमंत्री असते तर त्यांनी अँक्टिव्हपणे काम केले असते. पण ते मख्खमंत्री आहेत. राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवताना दिसत आहेत. मुख्यमंत्री केवळ ४० खोकेबाज आमदारांना एकत्र ठेवण्याच्या कामात गुंतले आहेत,” असे म्हणत राऊतांनी शिंदेंना खोचक टोला लगावला.

अमृता फडणवीस प्रकरणावर राऊतांची प्रतिक्रिया

“प्रकरण सध्या न्यायालयात आहे आणि त्यावर तपास सुरू आहे. त्यामुळे त्यावर मी बोलणं योग्य होणार नाही. काल सभागृहात काय झालं, मविआमध्ये काय झालं हे सगळं सोडून द्या. आता तुमच्या सरकारच्या काळात काय होतंय त्याकडे आधी बघा. आमच्याकडे बोटं करत असताना काही बोटं स्वत:कडेही आहेत हे लक्षात ठेवा. मला तोंड उघडायला लावू नका. हा कुटुंबाचा विषय आहे आणि आम्ही कुटुंबापर्यंत पोहोचत नाही. माझ्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार असून ते मी कायम पाळतो,” असे संजय राऊत म्हणाले.

आम्हीही या प्रकरणाचा तपास करू शकतो, पण…

“ब्लॅकमेलचं प्रकरण काय आहे याचा पोलिसांनी तपास करावा. आम्हीही तपास करू शकतो पण आम्हाला जास्त बोलायचं नाही. पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहावं आणि तपास करावा. कारण महाराष्ट्रात एखाद्या महिलेला ब्लॅकमेल केलं जात असेल तर ते गंभीर आहे. त्या मुख्यमंत्र्यांच्या-उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी असोत की सामन्या महिला असो, असा प्रकार घडणं निंदनीय आहे,” असा स्पष्ट विचार त्यांनी मांडला.


Previous Post

वादळी वीज पडून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना

Next Post

“त्या-त्या वेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेत”, अजित पवार

Next Post

"त्या-त्या वेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेत", अजित पवार

ताज्या बातम्या

सरकारी भरतीतील खाजगीकरणाचा जी.आर. तात्काळ रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा

मार्च 21, 2023

माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयागराजचे पथक २७ ते २९ या कालावधीत साताऱ्यात

मार्च 21, 2023

पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरेने करावीत

मार्च 21, 2023

‘लव्ह जिहाद’ पीडितांनी न घाबरता तक्रारी कराव्यात – नितेश राणे

मार्च 21, 2023

पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रंग शाहिरीचा कार्यक्रम

मार्च 21, 2023

गुढीपाडव्यापासून मिळणार ‘आनंदाचा शिधा’

मार्च 21, 2023
वडूज ता.खटाव येथील भूमी अभिलेख कार्यालय फलका नजीक पडलेल्या रिकाम्या बाटल्या

वडूजच्या भूमी अभिलेखा कार्यालयातील रिकाम्या बाटल्याचे मोजमाप करणे कठीण?

मार्च 21, 2023

शुभम नलवडे ठरले आळजापूर गावचे सर्वात कमी वयाचे ‘युवा सरपंच’; गावात जल्लोष

मार्च 21, 2023

रजनीकांत खटके यांच्या बेमुदत साखळी उपोषणास शिवसेना ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडी युतीचा जाहीर पाठिंबा

मार्च 21, 2023

महिला बचत गट उत्पादित वस्तुंचे २४ ते २६ मार्च कालावधीत प्रदर्शन व विक्री प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

मार्च 21, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!