स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करुया – खासदार श्रीनिवास पाटील

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 11, 2023
in सातारा जिल्हा

दैनिक स्थैर्य । दि. ११ जानेवारी २०२३ । सातारा । रस्ता सुरक्षा म्हणजे जीवन सुरक्षा असून आपला जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करुया, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.

सातारा सैनिक स्कूलच्या सभागृहात 34 व्या रस्ता सुरक्षा अभियान 2023 चे उद्घाटन श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी ते बोलत. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, सैनिक स्कूलचे लेंप्टनन कर्नल पी.डी. पाटील, एसटीचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे आदी उपस्थित होते.

सध्या वाहतुकीचा वेग वाढला  असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले, या वाढलेल्या वेगामुळेच अपघतांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे प्रवास करताना सर्वांनी वेगमर्यादेचे पालन करणे गरजेचे आहे. उशिर होतो म्हणून वेगाने वाहन चालविण्या ऐवजी वेळेच्या आदी पाच मिनिटे निघने महत्वाचे आहे. सहसा रात्रीचा प्रवास टाळावा. अपघात टाळण्यासाठी डोळे महत्वाचे आहेत. डोळे दिपणे, डोळे लागणे अशा कारणांमुळे अनेकदा अपघात होतात. त्यामुळे प्रवास करताना जास्ती काळजीपूर्वक राहणे गरजेचे आहे. प्रवासाचे योग्य नियोजन करा त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होते. दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा वापर करावा. मोबाईलचा वापर टाळणे म्हणजेच अपघात टाळने. अपघात मुक्ती ही सर्वांची सामुदायीक जाबाबदारी आहे. तसेच एखादा अपघात घडल्यास अपघातग्रस्तांना मदत करणेही तितकेच महत्वाचे आहे. सर्वांच्या सामुदायीक प्रयत्नांनेच अपघातांची संख्या कमी करता येणार आहे.

जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, रस्ता सुरक्षामध्ये नागरिकांचे योगदान महत्वाचे आहे. त्यासाठी नागरिकांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्देशच लोकांमध्ये जागृता निर्माण करणे हा आहे. नागरिकांनी स्वत:हून वाहतुकीचे नियम पाळावेत. विद्यार्थ्यांनाही या अभियानामध्ये सहभागी करुन घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याची भावना निर्माण झाल्यावर त्यातून जबाबदार नागरिक निर्माण होतात. सर्व नागरिकांनी या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रास्ताविकामध्ये श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यातील 34 ब्लॅकस्पॉट कमी केल्याचे सांगून  रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्देश व महत्व याची माहिती दिली. हेल्मेटचा वापर व पादचाऱ्यांनी फुटपाथ नसलेल्या ठिकाणी उजव्या बाजुने चालावे या विषयी जागृती करणे हे 34 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सध्या अपघात नियंत्रणासाठी विशेष तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांकडून हेल्मेटचा वापर, वेग, ऊस वाहतूक करणारी वाहणे यांची तपासणी केली जाते. वेग मर्यादा ओलांडल्या प्रकरणी सुमारे 10 हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच दर महा 60लाख रुपयांचा दंड विभागाकडून वसुल केला जातो. खासगी बसेसवर राज्यात सर्वाधिक कारवाई सातारा विभागाकडून करण्यात आली आहे. दुचाकी स्वारांची सुरक्षा यास प्राधान्य देवून अंमलबजावणी केली जात आहे. अपघातप्रवण स्थळांची यादी तयार करण्यात आली असून त्या तालुक्यांमध्ये मोटार वाहन निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचा नियमित आढावा घेतला जातो. एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास अपघात तपासणीसाठी नियुक्त केलेल्या पथकाद्वारे शास्त्रीय तपाणी करुन  पुन्हा त्या ठिकाणी अपघात होणार नाही यासाठी उपाययोजना केल्या जातात.


Previous Post

माजी मंत्री बच्चू कडू अपघातात गंभीर जखमी; रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराची धडक

Next Post

मुश्रीफांवरील ईडीची कारवाई निषेधार्ह – आमदार सतेज पाटील 

Next Post

मुश्रीफांवरील ईडीची कारवाई निषेधार्ह - आमदार सतेज पाटील 

ताज्या बातम्या

कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

January 28, 2023

छत्रपती शिवाजी कॉलेजेमध्ये शहीद वीर व राष्ट्रनिर्मात्याना मानवंदना

January 28, 2023

बौद्धजन पंचायत समितीच्या गट क्र. २२ च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

January 28, 2023

“तुम्ही तुमच्या मुलाची जागा वाचवली तरी पुरे”; संजय राऊतांचे CM एकनाथ शिंदेंना आव्हान

January 28, 2023

कीर्तन परंपरेचा आजच्या काळात नव्याने अभ्यास होणे गरजेचे – प्रा. डॉ. धनंजय होनमाने

January 28, 2023

भारतीय बौद्ध महासभा अंकुर बौद्ध विहार शाखेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

January 28, 2023

प्रजासत्ताक दिनी आटपाडीत प्रथमच सागर यांनी केली सत्यशोधक वास्तू पूजन

January 28, 2023

पारसिक बोगद्यामुळे प्रवासातील वेळेत बचत होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

January 28, 2023

भ्रष्टाचारमुक्तीचा संकल्प करा – हेमंत पाटील

January 28, 2023

विद्यार्थ्यांनो हसत खेळत परीक्षेला सामोरे जा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

January 28, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!