स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

ऊर्जा विभागातील नोकर भरतीत मराठा समाजावर अन्यायविद्यार्थ्यांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन; मराठा क्रांती मोर्चा फलटणचे निवेदन

Team Sthairya by Team Sthairya
December 3, 2020
in Uncategorized

स्थैर्य, फलटण दि.३ : ऊर्जा (महावितरण) विभागातील स्थापत्य अभियंता, उपकेंद्र सहाय्यक व विद्युत सहाय्यक या पदाकरिता प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आलेल्या स्थगितीमुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अद्याप नियुक्त्या देण्यात आल्या नाहीत. याबाबत मंत्रालयात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांची केवळ बैठक घेतली. त्यानंतर भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सामावून घेतले मात्र मराठा समाजातील विद्यार्थ्यांना यातुन वगळण्यात आले हा एक प्रकारचा मराठा समाजावर ऊर्जामंत्र्याचा आणि आघाडी सरकारचा अन्याय आहे. या अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास मराठा समाजाचा उद्रेक होईल व होणार्‍या नुकसानीस महाविकास आघाडी सरकार जबाबदार राहील असा इशारा मराठा क्रांती मोर्चा फलटणने निवेदनाद्वारे दिला आहे.

ऊर्जा खात्यातील नोकर भरती प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न सरकार व संबंधित विभागाकडून सुरू केला जात आहे व त्या मध्ये मराठा समाजातील मुलांना डावलण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप करून ही अन्याय कारक प्रक्रिया थांबविण्यासाठी बुधवार दि.2 डिसेंबर रोजी येथील कार्यकारी अभियंता वग्यानी यांना मराठा क्रांती मोर्चा फलटण यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी सर्व समन्वयक उपस्थित होते.

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सर्व विद्यार्थ्यांसह आम्ही भरती प्रक्रियेच्या विद्यार्थ्यांना एकत्रीत नियुक्त्या देण्यात याव्या यासाठी आवश्यकता असल्यास सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शन घ्यावे व त्यानंतरच भरती प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी आम्ही सामान्य प्रशासनाला निवेदन देऊन त्याबाबतचा अभिप्राय मागवला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय नाही झाला तर या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात सामावून घेतले जाईल असे ठोकळेबाज उत्तर सरकारकडून देण्यात आले आहे. मात्र या सर्व प्रकारातून ऊर्जाविभाग असो की आघाडी सरकार यांची मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका दिसत नाही. हा सर्व ऊर्जामंत्री ना.नितीन राऊत व ऊर्जाविभागाचा मराठा विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा उद्योग आहे, असा आरोपही सदर निवेदनात करण्यात आला आहे. 

दरम्यान सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टात बाजू मांडली पाहिजे त्या पद्धतीने मांडत नसून सरकार मधील काही मंत्री व राजकारणी मराठा समाजाबाबत गरळ ओकत आहेत. तसेच मराठा ओबीसी असा तेढ निर्माण करीत आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा नाहीतर आम्ही त्यांचा बंदोबस्त करू व यामध्ये मराठा समाजाचा रोष उफाळून आल्यास, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Related


Tags: फलटण
Previous Post

RBI ने HDFC बँकेवर घातले क्रेडिट कार्ड संदर्भात निर्बंध

Next Post

शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती हेच अजिंक्यतारा कारखान्याचे ध्येय; आ. शिवेंद्रसिंहराजे; एफआरपी ३०४३ रु., पहिली उचल २६०० रुपये

Next Post

शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती हेच अजिंक्यतारा कारखान्याचे ध्येय; आ. शिवेंद्रसिंहराजे; एफआरपी ३०४३ रु., पहिली उचल २६०० रुपये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात ११ व्या फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद

August 11, 2022

पानीपत’पूर्वीच कॉंग्रेसला आत्मचिंतनाची गरज – हेमंत पाटील

August 11, 2022

नारळी पौर्णिमेच्या उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

August 11, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन निमित्त शुभेच्छा

August 11, 2022

दुःखद निधन – कै. बाळासाहेब जाधव

August 11, 2022

ऑडी इंडियाकडून नवीन ‘ऑडी क्यू३’ साठी बुकिंग्ज्चा शुभारंभ

August 11, 2022
सदाशिव पाटील

एन आय पी एम च्या चेअरमन पदी सदाशिव पाटील

August 11, 2022

देशाच्या सैनिकांच्या सन्मानार्थ म्युझिकल फ्लॅश मॉबचे आयोजन

August 11, 2022
कै रवींद्र पेंढारकर

दुःखद निधन – कै रवींद्र पेंढारकर

August 11, 2022

पेटीएम ऍपवर ‘लाइव्ह ट्रेन स्टेटस’ सुविधा

August 11, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!