• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

कदर करणार्‍या लोकांमुळे गुणवत्तेत वाढ : तहसिलदार डोईफोडे

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 19, 2020
in Uncategorized

 

सिद्धेश्वर कुरोली : गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना तहसिलदार
स्वप्नाली डोईफोडे समवेत  कुलदिप डुबल, शशिकला देशमुख, प्रभावती देशमुख,
शितल देशमुख आदी. (छाया : समीर तांबोळी)

स्थैर्य, कातरखटाव, दि.१९: खटाव तालुक्यात चांगल्या कामांची कदर करणारे काही लोक व
संस्था आहेत. त्यांच्यामुळेच गुणवत्ता वाढ व तालुक्याच्या नावलौकीकात
दिवसेंदिवस भर पडत आहे. असे मत मलकापूर (जि. बुलढाणा) येथील तहसिलदार
स्वप्नाली डोईफोडे यांनी व्यक्त केले.

सिध्देश्वर कुरोली (ता. खटाव) येथील यशवंत हो जयवंत हो आश्रमात
येरळा परिवार व खटाव तालुका सोशल फौंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या नारी
गौरव व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आगारप्रमुख
कुलदिप डुबल, म्हाडाच्या माजी संचालिका शशिकला देशमुख, माजी उपसभापती
प्रभावती देशमुख, सरपंच शितल देशमुख, प्राचार्य दिलीपराव डोईफोडे,
प्राचार्य आनंदराव नांगरे, प्रा. दिलीप भुजबळ, डॉ. शंकर जाधव, दिपकशेठ
जगदाळे, सोपानकाका दिंडीचे विणेकरी रघुनाथ फडतरे, हैबतीबाबा भजनी मंडळ
दिंडी चालक निलेश पांचाळ, देवस्थानचे विश्वस्त कुमार शेटे, गजानन कुंभार,
संतोष बोराटे यांची प्रमुख उपस्थिती होती

कु. डोईफोडे म्हणाल्या, खटाव-माण तालुके हे जरी दुष्काळी तालुके असले
तरी या ठिकाणी बुध्दीवंतांची खाण आहे. चांगल्या बुध्दीवंत विद्यार्थ्यांना
पैलू पाडण्याचे काम येथील शिक्षक ध्येयवादाने करतात. तर सामाजिक
संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक चांगल्या गोष्टीची दखल घेतली जाते. येरळा
परिवार व खटाव फौंडेशनचे उपक्रम भावी पिढीसाठी मार्गदर्शक व दिशादर्शक
आहेत.

स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

आगारप्रमुख डुबल यांनी संस्थेच्या माध्यमातून एम.पी.एस.सी.,
यु.पी.एस.सी. विद्यार्थ्यांच्यासाठी अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्याची
सुचना केली. तसेच याकामी पुस्तक व अन्य सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

संस्थापक धनंजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. आयाज मुल्ला यांनी सुत्रसंचालन केले. विजय शिंदे यांनी आभार मानले. 

यावेळी रविना यादव, साक्षी इनामदार, प्रतिक काळे, गायत्री पवार,
सानिका जगताप, ज्ञानेश्वरी कोरे, आदित्य साबळे, दिया तांबोळी, ऋतुजा माळवे,
संकेत सजगणे या गुणवंत विद्यार्थी तसेच कुंभारगांव नवदुर्गा पुरस्कार
विजेत्या सुनिता महामुनी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


Tags: सातारा
Previous Post

ग्रामस्थांच्या पाठबळामुळे जि.प. शाळांना चांगले दिवस येतील : मालोजी देशमुख

Next Post

स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post

स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी ‘आयएफसी’ सोबतचा भागिदारी करार उपयुक्त ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे प्रतिपादन

मार्च 29, 2023

प्रवचने – पैशाच्या आसक्तित राहू नये

मार्च 29, 2023

कमी पाण्यात जास्तीच्या उत्पन्नाची हमी देणारी ‘प्रति थेंब अधिक पीक योजना’

मार्च 29, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मार्च 29, 2023

कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे संजय कोळी यांचे दीर्घ आजाराने निधन

मार्च 29, 2023

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात सातारा जिल्हा राज्यात अव्वल

मार्च 29, 2023

वझीरएक्सने पारदर्शकता अहवालाची चौथी आवृत्ती सादर केली

मार्च 29, 2023

मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पाचे काम आठ दिवसात मार्गी लावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

मार्च 29, 2023

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराचे वितरण

मार्च 29, 2023

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना

मार्च 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!