
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२२ । सातारा । कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कराडच्या प्रीतिसंगमावर नदीची पाणी पातळी वाढली आहे. सध्या धरणातून काही प्रमाणात विसर्ग सुरु आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढताच आहे. मुंबईत मुसळधार पाऊस सुरुय. त्यामुळं काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळालं. तर, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावलीय. मुसळधार पावसामुळं नद्यांच्या पाणीपातळीत वाढत आहे. बऱ्याच ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. गुजरात कर्नाटकामध्ये देखील पावसानं मोठं नुकसान केलंय.
