स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

लोकमान्य टिळकांच्या वैचारिक वारशाचा महाराष्ट्रावर प्रभाव – राज्यशास्त्रज्ञ डॉ अशोक चौसाळकर

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
March 28, 2021
in देश विदेश

स्थैर्य, नवी दिल्ली, दि. २८: आशियाई देशातील लोकांचे जनजागरण, भारतीय धर्मनिपरपेक्ष राष्ट्रवादाची मांडणी आणि देशात लोकशाही स्थापन होण्यासाठी मांडलेले विचार हे लोकमान्य टिळकांच्या वैचारिक वारशाचे महत्त्वाचे पैलु असून त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही जाणवतो, असे मत विचारवंत व राज्यशास्त्रज्ञ डॉ. अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे दहावे पुष्प गुंफताना ‘लोकमान्य टिळक यांचा वारसा’ या विषयावर डॉ. चौसाळकर बोलत होते.

आधुनिक भारताच्या इतिहासात 1880 ते 1920 या कालावधीत लोकमान्य टिळकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ब्रिटीश सत्ताधाऱ्यांविरुध्द उभे राहण्यासाठी त्यांनी भारतीय जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. दैनिक केसरीच्या शिरोभागी लिहिलेल्या श्लोकातून टिळकांनी ब्रिटीश सत्तेचा मदांध सत्ताधारी असा उल्लेख करून मोठे आवाहन दिले होते व आयुष्यभर त्यांनी ब्रिटीश साम्राज्यवादाविरूध्द लढा दिला. या संपूर्ण कालावधीत लो.टिळकांनी दिलेला वैचारिक वारसा हा आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वपूर्ण असल्याचे डॉ. चौसाळकर म्हणाले.

ब्रिटीशांच्या दडपशाहीमुळे भारतीय जनतेमध्ये निर्माण झालेली भीती नष्ट करून त्यांच्यामध्ये वीर वृत्तीचे पोषण करण्याचे कार्य टिळकांनी केले. टिळकांनी मराठी भाषेत लिखाण केले त्यासाठी वर्तमानपत्र काढले. लोकांमध्ये जावून कार्य केले. लोकचळवळ उभारल्या. राजकीय कारणासाठी तुरुंगवास भोगणारे लो. टिळक हे पहिले भारतीय राजकीय पुढारी होत. कोल्हापूर प्रकरणात लो. टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांना 101 दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला. 1897 ते 1899 या काळात त्यांना राजद्रोहासाठी तुरुंगवास भोगावा लागला. 1908 ते 1914 असा दीर्घ काळाचा कारावास त्यांना ब्रह्मदेशातील मंडाले तुरुंगात भोगावा लागला.

1918 साली पॅरीस येथे भरलेल्या परिषदेत टिळकांनी राष्ट्रीय स्वयं निर्णयाचा प्रस्ताव मांडला होता व अनेक देशांनी याला पाठिंबा दिला. टिळकांनी राष्ट्रवादाची शिकवण दिली. धर्माधिष्टीत राष्ट्रात प्रत्येकास आपला धर्म पाळण्याचा अधिकार आहे असा धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद त्यांनी मांडला. टिळकांनी स्वराज्याची कल्पना मांडताना लोकशाही राज्याची भूमिका मांडली. स्वराज्यात जनतेला स्वत:चे भवितव्य घडविण्याचा अधिकार असावा, लोकांना मनाप्रमाणे सरकार निवडण्याचा अधिकार असावा, स्वराज्याचा कारभार लोककल्याणासाठी व्हावा असे टिळक मानत. ‘गीता रहस्य’ ग्रंथाच्या माध्यमातून आपले कर्तव्य निस्वार्थपणे करावे व अन्यायाचा निष्काम भावनेने प्रतिकार करावा, असा विचार टिळकांनी मांडला.

‘स्वराज्य’, ‘स्वदेशी’, ‘राष्ट्रीय शिक्षण’ आणि ‘बहिष्कार’ या चतु:सूत्रीच्या आधारावर टिळकांनी ब्रिटीश सरकार विरुध्द निडरपणे संघर्ष केला. 1905-06 मध्ये देशात वंगभंगाविरूध्द सुरु झालेल्या स्वदेशी चळवळीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल मध्ये टिळकांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी ‘होमरूल चळवळ’ अर्थात ‘स्वराज्य संघाची चळवळ’ सुरु केली त्यासाठी त्यांनी होमरूल लीगची स्थापना केली व  हजारो लोकांना लीगचे सभासद बनवले.

होमरूल लीगचे महत्त्व सांगताना लो. टिळकांनी, ‘स्वराज्य माझा जन्म सिध्द हक्क आहे व तो मी मिळविणारच’ अशी प्रसिध्द घोषणा केली. हजारो लोक या चळवळीत सहभागी झाले. या चळवळीत स्त्रिया मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या. स्वराज्याचे अधिकार हे जनतेचे जन्मसिध्द अधिकार असून नैसर्गिकरित्या ते प्राप्त झाले आहेत अशी  टिळकांची मांडणी होती.

टिळकांनी काँग्रेस डेमोक्रॅटीक पार्टीची स्थापना करून 1920 मध्ये त्या पार्टीचा जाहीरनामा घोषित केला. यात नवभारताची प्रतिमा अभिव्यक्त झाल्याचे दिसते. लोकमान्य टिळकांनी देशासह महाराष्ट्राला दिलेला हा वैचारिक वारसा जपून महाराष्ट्राला पुढे घेवून जावू या असा विश्वास डॉ.चौसाळकर यांनी यावेळी मांडला.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

‘कोरोना’संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

Next Post

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर होळी, धूलिवंदन व रंगपंचमी साधेपणाने साजरी करण्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

Next Post

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर होळी, धूलिवंदन व रंगपंचमी साधेपणाने साजरी करण्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,024 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा

April 12, 2021

‘५० वर्षावरील कलाकारांसाठी मासिक मानधन योजना’ विहित प्रक्रियेनुसारच – सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे स्पष्टीकरण

April 12, 2021

भीती न बाळगता लस घ्या – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

April 12, 2021

मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत : पालकमंत्री छगन भुजबळ

April 12, 2021

राज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आदींशी चर्चा करून परीक्षेसंदर्भात निर्णय घेणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

April 12, 2021

नेस्को संकुलात आणखी १५०० खाटांची सुविधा; कोविड सेंटरसाठी आमदार निधीतून मशिन्स देणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

April 12, 2021

बारावीची परीक्षा मे अखेरीस तर १० वीची परीक्षा जूनमध्ये घेण्याबाबतचे नियोजन आणि परिपूर्ण तयारी करावी – मुख्यमंत्री

April 12, 2021

फलटण तालुक्यातील १५७ तर सातारा जिल्ह्यातील १०१६ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; १० बाधितांचा मृत्यु

April 12, 2021

लॉकडाऊनऐवजी कोरोनावर प्रभावी उपाय करा – भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

April 12, 2021

माजी आमदार पास्कल धनारे यांच्या निधनाने आदिवासींचा सेवक गमावला – भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी अर्पण केली श्रद्धांजली

April 12, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.