स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

बळीराजा पेटून उठला तर सरकारला तोंड दाखवणे अवघड होईल : राजू शेट्टी

Team Sthairya by Team Sthairya
December 4, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, फलटण दि.४ : राजधानी दिल्लीत सुरु असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन हे केवळ ठराविक राज्यांपुरते मर्यादित नसून त्या आंदोलनाला देशभरातील शेतकर्‍यांचा पाठींबा आहे. केंद्र सरकार शेतकर्‍यांची मुस्कटदाबी करत असून आंदोलनावर तोडगा काढण्याऐवजी आंदोलन विविध मार्गाने दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे. केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्यांचा तात्काळ विचार करावा. जर देशातील बळीराजा आणखीन पेटून उठला तर सरकारला तोंड दाखवणे अवघड होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. 

राजू शेट्टी हे फलटण येथे जुन्या खटल्याच्या संदर्भात न्यायालयीन कामकाजासाठी आले होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, शहराध्यक्ष सचिन खानविलकर, डॉ.रवींद्र घाडगे, संजय चिटणीस, प्रमोद गाडे, दादा जाधव आदी उपस्थित होते. 

राजू शेट्टी पुढे म्हणाले, केंद्र सरकारच्या अन्यायकारक कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या भागातील शेकर्‍यांनी आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन देशातील शेतकर्‍यांचे आंदोलन आहे. या शेतकर्‍यांच्या पाठींब्यासाठी आम्हीपण कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार असून स्वाभीमानी शेतकरी संघटनादेखील कृषी कायद्याविरोधात आवाज उठवत राहणार आहे. तर आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला तर त्याला जशाच तसे उत्तर दिले जाईल, असे ही शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील वाढीव वीज बिलांबाबत शेट्टी यांना विचारले असता ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनच्या काळात राज्यातील जनतेला अपेक्षित मदत केलेली नाही. या काळात आधीच जनतेचे प्रचंड हाल झालेले असताना सरकारने भरमसाठी वीज बीले लोकांच्या माथी मारलेली आहेत. ही वीज बिले कमी करण्यासाठी जनतेने आवाज उठवला तरी सरकार याकडे लक्ष देत नाही. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी 100 युनिटपर्यंत वीज माफ करण्याचा केलेला दावा देखील फसवा ठरला. त्यांना अधिकार नव्हता तर त्यांनी कशासाठी वल्गना केल्या असा सवाल करुन सरकारने ‘त्या’ तीन महिन्यातील संपूर्ण वीज बिले माफ करावीत. सरकारने याबाबात तात्काळ गांभीर्याने विचार न केल्यास ‘स्वाभीमानी’ या विरोधात आंदोलन करेल, असा इशारा शेट्टी यांनी यावेळी दिला. 

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

साखर कारखान्यांच्या एकरकमी एफआरपीबद्दल शेट्टी यांना विचारले असता, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात साखर कारखान्यांनी एकरमकी एफआरपी शेतकर्‍यांच्या खात्यावर भरली आहे. सातारा जिल्ह्यात मात्र एक कारखाना वगळता अन्य कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही. याबाबत 5 डिसेंबर रोजी होणार्‍या बैठकीत जर निर्णय झाला नाही तर सांगली, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यातील शेतकर्‍यांना एकत्रित करुन 2013 साली कराड येथे ज्या पद्धतीने मोठे आंदोलन केले होते त्याच आंदोलनाची पुनरावृत्ती सातारा येथे करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगीतले.

खटल्याच्या निमित्ताने जुने मित्र आमने – सामने पण एकमेकांकडे दुर्लक्ष

दरम्यान, जुन्या खटल्याच्या निमित्ताने फलटण न्यायालयात राजू शेट्टी यांच्यासह स्वाभीमानी शेतकरी संघटनेतील एकेकाळचे त्यांचे जुने सहकारी मित्र, रयतक्रांती शेतकरी संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत हे देखील आपल्या कार्यकर्त्यांसमवेत हजर होते. मात्र राजकारणाच्या निमित्ताते गेल्या काही वर्षांपासून दोघांमध्ये एकमेकांविषयी कमालीची कटुता आली असल्याने दोघांनीही आमने – सामने येवूनही एकमेकांकडे दुर्लक्ष करणेच पसंद केले.

Related


Tags: फलटण
Previous Post

पुणे-बंगळूर महामार्गावरील कार अपघातात पुण्याचे दोघे जागीच ठार

Next Post

पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीत श्री.अरुण लाड विजयी

Next Post

पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीत श्री.अरुण लाड विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉल्बी का वाजू नये याचे उत्तर प्रशासनाने द्यावे – खासदार उदयनराजे भोसले यांचा साताऱ्यात रोखठोक पवित्रा

August 20, 2022

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे दर्शन

August 20, 2022

अवैधरित्या दारुची वाहतूक केल्याप्रकरणी एकावर कारवाई

August 20, 2022

दुष्काळ पीडित शेतकऱ्याच्या भावना समजून घेवून त्यांचे मनोबल वाढवा – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

August 20, 2022

युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

August 20, 2022

प्रवचने – दास विषयाचा झाला। सुखसमाधानाला आंचवला॥

August 20, 2022

माजी सैनिकांसाठी काम व क्षयरोग निर्मूलनासाठी बीड जिल्ह्यात होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

August 20, 2022

सातारा शहर परिसरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे

August 20, 2022

मुख्यमंत्री प्रणित जिल्हा शिवसेनेची जबाबदारी पुरुषोत्तम जाधव यांच्याकडे

August 20, 2022

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतले परळी वैजनाथाचे दर्शन

August 20, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!