• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
No Result
View All Result
शनिवार, फेब्रुवारी 4, 2023
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

मी तर लोकसेवक, माझी पात्रता काय? – काँग्रेसच्या टीकेला पंतप्रधान मोदी यांचे उत्तर

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
जानेवारी 25, 2023
in देश विदेश

‘मी जनसेवक आहे, माझी पात्रता ती काय?’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचारसभेत काँग्रेसवर टीका केली. तेलंगणात पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांच्या शिव्याशाप हेच माझे पोषण आहे, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता गुजरातमध्ये काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या पात्रतेसंदर्भातील वक्तव्याचा पंतप्रधानांनी समाचार घेतला. आगामी निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे मिस्त्री म्हणाले होते.

सुरेंद्रनगर जिल्ह्यातील ध्रांगध्रा, भरूच जिल्ह्यातील जंबूसर आणि नवसारी शहरात सोमवारी पंतप्रधान मोदी यांच्या सभा झाल्या. सुरेंद्रनगरमध्ये पंतप्रधान म्हणाले, ‘काँग्रेसचे लोक म्हणतात की, ते मोदींना त्यांची जागा दाखवतील. अहो, तुम्ही राजघराण्यातील आहात, मी सामान्य कुटुंबातील आहे. माझी कोणतीही पात्रता नाही. माझी पात्रता मला दाखवू नका, मी जनतेचा सेवक आहे, नोकराची कोणतीही पात्रता नसते. कृपया विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करा. गुजरात विकसित करण्यासाठी मैदानात या.’

गांधीनगर : प्रतिष्ठेचा लढा
गुजरात निवडणुकीत अमित शहा अधिकाधिक वेळ आपल्या गृहराज्यात व्यतित करू लागले आहेत.  गांधीनगर हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. तेथून पक्षाला अधिक यश मिळवून देण्यासाठी त्यांनी जोर लावला आहे.

आदिवासींच्या अस्तित्वाकडे काँग्रेसचे दुर्लक्ष
– प्रभू राम आणि भगवान कृष्णाच्या काळापासून आदिवासी देशात राहत असतानाही काँग्रेसच्या नेत्यांचे आदिवासींच्या अस्तित्वाकडे दर्लक्ष झाले, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील आदिवासीबहुल भरूच जिल्ह्यातील जंबूसर शहरात केली.
– सार्वजनिक कार्यक्रमात पारंपरिक आदिवासी पोशाख परिधान केल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची थट्टा केली होती, असा दावाही त्यांनी केला.
– “अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होईपर्यंत आदिवासींसाठी वेगळे मंत्रालय का नव्हते? केंद्रात अटलजींच्या सरकारने वेगळे मंत्रालय बनवले व त्यांच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली,” हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

‘भारत जोडो’वर टीका
सत्तेबाहेर फेकलेल्यांना यात्रेच्या माध्यमातून परतायचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. नर्मदा प्रकल्प रोखणाऱ्यांबरोबर काँग्रेस नेते ‘भारत जोडो यात्रा’ काढत आहेत, अशी टीका केली. नर्मदा प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांचा पराभव करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


Previous Post

साखर उद्योगाच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्राचे सहकार्य

Next Post

मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन – राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित

Next Post

मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन – राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित

ताज्या बातम्या

‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार

फेब्रुवारी 4, 2023

जिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा! चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी

फेब्रुवारी 4, 2023

सेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

फेब्रुवारी 4, 2023

राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा

फेब्रुवारी 4, 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा

फेब्रुवारी 4, 2023

राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

फेब्रुवारी 4, 2023

खासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

फेब्रुवारी 4, 2023

प्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील

फेब्रुवारी 4, 2023

तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री

फेब्रुवारी 4, 2023

ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे

फेब्रुवारी 4, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!