• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
No Result
View All Result
शनिवार, फेब्रुवारी 4, 2023
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

लव्ह – जिहाद, धर्मांतरण तसेच गो हत्याचे वाढते प्रकार रोखण्यासाठी सरकारने कडक कायदा करावा

फलटणमध्ये विराट हिंदू जनआक्रोश मोर्चा

Team Sthairya by Team Sthairya
जानेवारी 9, 2023
in देश विदेश, प्रादेशिक, फलटण, सातारा जिल्हा

दैनिक स्थैर्य । दि. ०९ जानेवारी २०२३ । फलटण । लव्ह जिहाद, धर्मांतरण तसेच गो हत्याचे वाढते प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक कायदा करावा, या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाने रविवारी फलटण येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला होता. त्या मध्ये हजारो कार्यकर्ते, महिला, युवक व युवती भगवे ध्वज हातात घेऊन भगव्या टोप्या भगवी वस्त्र परिधान करून “जय भवानी, जय शिवाजी” घोषणा देत मोर्चात सहभागी झाले होते.

यावेळी फलटणमधील हिंदुत्ववादी संघटना विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. फलटण तालुक्यातील सर्वच हिंदू संघटना यांनी एकत्र येऊन नेटके असे नियोजन केले होते. या मध्ये तरुणांचा सहभाग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून भगव्या ध्वजाचे पूजन करून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा भगवा ध्वजासह छत्रपती शिवाजी महाराज चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – महावीर स्तंभ – उमाजी नाईक चौक – गजानन चौक – महात्मा फुले चौक मार्गे मोर्चा फलटण प्रांताधिकारी कार्यालयात धडकला. यावेळी काही वक्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

यानंतर प्रांताधिकारी शिवाजी जगताप व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना मोर्चेकरांच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात लव्ह जिहाद, धर्मांतर बंदी यासाठी स्वतंत्र कायदा करून या सामाजिक प्रश्नी शासनाने निर्णय घ्यावा. गोहत्या बंदी कायदा यासाठी केंद्र आणि राज्य असणारे प्रतिबंधात्मक कारवाईसाठी समस्या नियुक्त केलेले आहेत. मात्र या कायद्याचे अंमलबजांनी आपल्या सातारा जिल्हात प्रशासना करीत नाही परिणामी राज्यातील मोठ्या प्रमाणात कमी होत चालले आहेत. 4 मार्च 2015 अन्वये मूळ कायद्यात दुरुस्ती करून नव्याने कायदा अस्तित्वात आणला आहे. मात्र या कायद्याचे पालन करणे प्रशासनाचे कर्तव्य असताना देखील कार्यवाही व अंमलबजावणी होत नाही. ती त्वरित व्हावी. लोकसंख्या नियंत्रण कायदा व वक्फ बोर्ड रद्द करणे, देशात समान नागरी कायदा लागू करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.


Previous Post

खासदार रणजितदादांना केंद्रीय मंत्री करा; निंभोरे ग्रामस्थांची मागणी

Next Post

सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोरे , पर्यटन विकास व पोलीस विभागाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

Next Post

सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोरे , पर्यटन विकास व पोलीस विभागाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

ताज्या बातम्या

‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार

फेब्रुवारी 4, 2023

जिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा! चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी

फेब्रुवारी 4, 2023

सेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

फेब्रुवारी 4, 2023

राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा

फेब्रुवारी 4, 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा

फेब्रुवारी 4, 2023

राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

फेब्रुवारी 4, 2023

खासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

फेब्रुवारी 4, 2023

प्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील

फेब्रुवारी 4, 2023

तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री

फेब्रुवारी 4, 2023

ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे

फेब्रुवारी 4, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!