• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

भाविकांना सरकारचे दिवाळी गिफ्ट : पाडव्यापासून मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडणार

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 14, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, मुंबई, दि.१४: राज्यात कोरोना आणि
लॉकडाउनपासून बंद असलेली मंदिरे आणि सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा अखेर
मुहूर्त निघाला आहे. पाडव्यापासून सर्व प्रार्थनास्थळे खुली करणार असल्याची
घोषणा शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. परंतु, या दरम्यान
सर्वांना सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियम पाळावे लागतील याची आठवणही यावेळी
मुख्यमंत्र्यांनी करून दिली. मुख्यमंत्री म्हणाले, की हा फक्त सरकारी आदेश
नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो,
पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर
प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व
महाराष्ट्राला मिळतील!

बेसावध राहून चालणार नाही

मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे.
प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली
असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार
नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही.
राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या
तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर
साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त,
सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही.
इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात
शिस्त पाळलीच. याची आठवणही यावेळी उद्धव ठाकरेंनी करून दिली.

स्वतःबरोबर इतरांचेही रक्षण करा

गेल्या
काही दिवसांपासून प्रार्थनास्थळे बंद असली तरीही डॉक्टर्स, परिचारिका,
वॉर्ड बॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता.
देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह
सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम,
शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष
प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा असे आवाहन
मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

उल्लेखनीय
बाब म्हणजे, या प्रकरणी भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी महाविकास आघाडी
सरकारमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. भाजपने मंदिर आणि प्रार्थनास्थळे
उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन पुकारले होते. तर याच प्रकरणी राज्यपाल भगत
सिंह कोश्यारी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता
फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. तर राज्यपाल आणि
मुख्यमंत्र्यांचा प्रार्थनास्थळांचा वाद चक्क केंद्र सरकारपर्यंत गेला
होता.


Tags: राज्य
Previous Post

एकनाथ खडसे, शेट्टी यांची विधान परिषद हुकणार; महाविकास आघाडीतील नेत्यांचाच अंदाज

Next Post

जिल्ह्यातील 134 संशयितांचेअहवाल कोरोना बाधित ;2 बाधितांचा मृत्यु

Next Post

जिल्ह्यातील 134 संशयितांचेअहवाल कोरोना बाधित ;2 बाधितांचा मृत्यु

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मार्च 27, 2023

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

मार्च 27, 2023

गोवा मुक्ती संग्रामच्या प्रत्यक्षदर्शी चंद्राबाई जाधव कालवश

मार्च 27, 2023

एफसी मद्रासने विश्वस्तरीय रेसिडेन्शियल फुटबॉल अकॅडेमी सुरु केली

मार्च 27, 2023

फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम जाहीर : दि. ३० एप्रिल रोजी मतदान व मतमोजणी

मार्च 27, 2023

सीएलएक्सएनएसचा प्रबळ टीम तयार करण्याचा मनसुबा

मार्च 27, 2023

नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयातील प्रत्येक घटकानी माध्यम म्हणून काम करावे – न्यायाधीश भूषण गवई

मार्च 27, 2023

पशुसंवर्धन विभागाच्या सधन कुक्कुट विकासगट योजनेतून कुरुलच्या हणमंत कांबळे यांची प्रगती

मार्च 27, 2023

मुंबईचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

मार्च 27, 2023

मांग गारुडी समाजाच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मार्च 27, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!