स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाआघाडी सरकार कडून धनगर समाजाची फसवणूक : गणेश हाके

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 11, 2021
in महाराष्ट्र
ADVERTISEMENT

स्थैर्य, मुंबई, दि.११: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत आघाडी सरकार कटिबद्ध आहे असे अनेकदा सांगितले आहे. मात्र सत्तेत येऊन वर्ष झाले तरी या सरकारने धनगर आरक्षणासाठी केंद्राला दोन ओळीची शिफारसही केलेली नाही ही धनगर समाजाची फसवणूक आहे. आघाडी सरकारने तातडीने केंद्राला धनगर आरक्षणासाठी शिफारस न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

पत्रकात श्री. हाके यांनी म्हटले आहे की, धनगर समाजाला आदिवासी समाजाचे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्या शिफारशीची आवश्यकता असून शिफारशीनंतरच केंद्रातील आदिवासी विभाग व आदिवासी आयोग धनगर आरक्षणाचा प्रस्ताव संसदे समोर मंजुरीसाठी ठेवेल. जो पर्यंत राज्य सरकारची शिफारस असणार नाही तोपर्यंत केंद्र काहीही करू शकणार नाही. असे केंद्रीय विकास राज्यमंत्री रेणुका सिंह-सरुता यांनी दिल्लीत नुकत्याच झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे.

धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १९७९ साली शिफारस केली होती. परंतु १९८१ साली महाराष्ट्र सरकारने शिफारस मागे घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार धनगर समाजाला आरक्षण देऊ शकणार नाही असेही रेणुका सिंह-सरुता यांनी सांगितल्याचे श्री. हाके यांनी नमूद केले.

धनगर समाजाच्या विविध संघटनांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती केल्यावरून रामदास आठवले यांनी आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा यांच्या सोबत बैठकीचे आयोजन केले होते. संसदीय कामकाजामुळे अर्जुन मुंडा यांनी आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह-सरुता यांना बैठकीस उपस्थित राहण्यास सांगितले होते.

धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुग गिळून गप्प आहेत. याबाबत धनगर समाजात तीव्र असंतोष आहे. केंद्र सरकाच्या म्हणण्यानुसार राज्य सरकारने केंद्र सरकारला तातडीने शिफारस केली नाही तर धनगर समाजाच्या वतीने राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय दिल्ली येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला असेही श्री. हाके यांनी पत्रकात म्हटले आहे.

नवीन संसदेच्या आवारात अहिल्यादेवींचा पुतळा उभारावा

या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे दिल्लीत भव्य स्मारक उभारावे, नव्या संसद भवनाच्या आवारात अहिल्यादेवींचा पुतळा उभारावा, धनगर समाजाच्या मुलांसाठी दिल्लीत वसतिगृह उभारावे याही मागण्यांबाबत चर्चा झाली. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी धनगर समाजाच्या मागण्यांसदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा यांची लवकरच भेट घालून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीस खा.डॉ.विकास महात्मे, आ. राजेश पवार, रामराव वडकुते, बापूसाहेब शिंदे, व्यंकट मोकले, यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली येथील धनगर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.


ADVERTISEMENT
Previous Post

बुलडाणा जिल्ह्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

Next Post

विधानसभा निवडणुकांवर ममता दीदी म्हणाल्या – ‘तृणमूल 221 पेक्षा कमी जागा जिंकणार नाही

Next Post

विधानसभा निवडणुकांवर ममता दीदी म्हणाल्या - 'तृणमूल 221 पेक्षा कमी जागा जिंकणार नाही

ताज्या बातम्या

IPL वेळापत्रक जाहीर : 9 एप्रिलपासून होणार आपीएलच्या 14 व्या मोसमाची सुरुवात

March 7, 2021

‘ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेचा विश्वासघात केला, त्यांचे स्वप्न भंग केले’ – पंतप्रधान मोदी

March 7, 2021

परिवर्तन बंगालमध्ये नाही, दिल्लीत होणार; भाजपकडून पैसे घ्या आणि तृणमूलला मतदान करा – ममता बॅनर्जी

March 7, 2021

11 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान अंशतः लॉकडाउन; जाहीर सभा, आठवडी बाजारासह शाळा-महाविद्यालये बंद

March 7, 2021

‘साधनेद्वारे आत्मतेज जागवणे’, हे खरे सबलीकरण !

March 7, 2021

आंतरराष्ट्रीय महिलादिनी ‘ट्रेल’चा ‘मॉमप्रेनर्स’च्या कार्याला सलाम

March 7, 2021

‘आई मला माफ कर…’ अधिकारी तरुणीची भंडाऱ्यात आत्महत्या

March 7, 2021

रिलायंस समूहातील सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत लस; लसिकरणाचा खर्च कंपनी उचलणार

March 7, 2021

दहावी-बारावी सीबीएसई परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, सुधारीत वेळापत्रक सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध

March 7, 2021

क्रूड उत्पादनात कपात सुरूच; पेट्रोल-डिझेल आणखी महाग‌!

March 7, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.