स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फडणवीसांकडून पेट्रोल दर वाढीचे समर्थन

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 4, 2021
in महाराष्ट्र
ADVERTISEMENT

स्थैर्य,मुंबई, दि. ४: विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू आहे. यामध्ये त्यांनी पेट्रोल दरवाढीचे समर्थन केले आहे. तसेच शिवसेना पेट्रोल दरवाढविरोधात नौटंकी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राज्य सरकारनेच कर कमी करावे किंमती कमी होतील असे ते म्हणाले आहेत.

शिवसेनेचे आंदोलन म्हणजे नौटंकी

इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेकडून उद्या राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, शिवसेनेने पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात मोर्चा काढण्यापूर्वी राज्याचे टॅक्स कमी करावे. शिवसेनेने मोर्चा काढण्यापेक्षा टॅक्स कमी करावे. आमचे सरकार असताना टॅक्स कमी करण्यात आले होते. दोन रुपयांनी पेट्रोल-डिझेल चे दर कमी झाले होते. यामुळे राज्य सरकारने टॅक्स कमी करावे. तसेच मोर्चे काढण्याची नौटंकी करु नये असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसेने काय आरोप केला हे माहित नाही, मात्र खंडणीखोरीचे आरोप शिवसेनेवर नेहमीच होत असतात.

शेतकरी आंदोलनाच्या नावे सगळे पोळी भाजत आहेत

यासोबतच शेतकरी आंदोलनाला भांडवल करून स्वतःचे राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न सर्वांकडून केला जात आहे. याच निमित्ताने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जो तो ज्याची त्याची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोय असेही फडणवीस म्हणाले.

हिंदुत्व कोणाचीच मक्तेदारी असू शकत नाही

हिंदुत्वाची मक्तेदारी काही भाजपाकडे नाही. देशातील सद्य:स्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा आहे असे दिसते. जनता पर्याय शोधू लागते तेव्हा तो निर्माणही होतो, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एका कार्यक्रमात केले होते. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ‘हिंदुत्व कोणाचीच मक्तेदारी असू शकत नाही. हिंदुत्व हे जगावे लागत असते. केवळ भाषणातून बोलून चालत नाही. ज्यावेळी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे जनाब बाळासाहेब होतात आणि ज्यावेळी शिवगान स्पर्धा बंद होते आणि अजान स्पर्धा सुरु होते तेव्हा अशा प्रकारचे वक्तव्य द्यावे लागले. याच कारणामुळे त्यांनी कदाचित हे वक्तव्य केले. हिंदुत्व आमची मक्तेदारी नाही, पण तुम्ही का हिंदुत्व सोडले एवढेच सांगा’ असा सवालही फडणवीसांनी केला आहे.

सरकार शरजीलला पाठीशी घालत आहे

राम मंदिरासाठी निधी गोळा केला जातोय. राम मंदिरचे पैसे जनतेने द्यावे की सरकारने द्यावे , यावर सामनामध्ये अग्रलेख लिहिण्यात आला. मात्र शरजील प्रकरणावर अग्रलेख यायला 4 दिवस लागतात. यावरुनच स्पष्ट होते की सरकार शरजीलला पाठीशी घालत आहे. आम्ही ज्यावेळी आंदोलन केले त्यानंतर सरकारला जाग आली आणि कार्यवाही करण्याचे सांगण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.


ADVERTISEMENT
Previous Post

चौरी-चौरा शताब्दी उत्सव : मोदींनी या कार्यक्रमातही काढली शेतकऱ्यांची आठवण, म्हणाले- ‘या संघर्षात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते’

Next Post

इंधन दरवाढीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रावर टीकास्त्र

Next Post

इंधन दरवाढीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रावर टीकास्त्र

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी : श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर

March 6, 2021

जिल्ह्यातील चार टोळ्यातील 18 जण तडीपार जिल्हा पोलीस प्रमुखांची मोठी कारवाई : नागरिकांतून समाधान

March 6, 2021
औंध येथील उपोषणकर्ते ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांच्याशी चर्चा करताना तालुका कूषी अधिकारी राहुल जितकर व अन्य

औंध येथील ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांचे बेमुदत उपोषण पाचव्या दिवशी ही सुरू; तालुका कूषी अधिकार्यांची उपोषण स्थळी भेट

March 6, 2021

महिलेचा विनयभंग

March 6, 2021

धारदार शस्त्राने वार करून सव्वा लाखाचा ऐवज लुटला 

March 6, 2021

आईसाहेब महाराज पालखी सोहळ्याचे भाडळी बु.।। येथे स्वागत

March 6, 2021

महिला दिनानिमित्त बोरावके हिरो मध्ये सर्व स्कूटरवर भरघोस सूट

March 6, 2021

भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे; कॉलिटी कंट्रोल मार्फत तपासणी करूनच रस्त्याची कामे सुरू करावीत : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 6, 2021

बांध फोडल्याचा जाब विचारलाच्या मारहाणीत सहा जण जखमी

March 6, 2021

ताथवडा घाटात दरोडा टाकून लूटमार करणाऱ्या टोळी फलटण ग्रामीण पोलिसांकडून जेलबंद

March 6, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.