कृषीदूतांनी दिले शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाचे प्रात्यक्षिक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, कृषी महाविद्यालय फलटण येथील अंतिम वर्षातील कृषीदूतांमार्फत ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत आसनगावातील शेतकर्‍यांना भाजीपाला जास्त काळ टिकवण्यासाठी शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष कसा तयार करावा, याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होणार्‍या वस्तूंचा वापर करून करता येते. या शीतकक्षाचा वापर फळांचा व फळभाज्यांचा साठवण कालावधी वाढवण्यासाठी वापर करता येतो. यामुळे फळे जास्त काळ टिकतात व त्यांची नासाडी टाळता येते. शीतगृहाची उभारणी ही अत्यंत महागडी असून ती सर्वसामान्य शेतकर्‍याला आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसते. त्यांच्यासाठी शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष उभारणे फायद्याचे ठरते. हे प्रात्यक्षिक बघण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नितीषा पंडित, तसेच प्रा. अश्विनी नगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी कृषीदूत शुभम मोरे, सिद्धांत फडतरे, विजय नाळे, अनिकेत मदने, ऋषिकेश चव्हाण, अभिषेक खोसे, अजिंक्य मोरे यांनी प्रात्यक्षिक दाखवले.


Back to top button
Don`t copy text!