स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अभिनेते राजीव कपूर यांचे निधन, हृदयविकाराच्या झटक्याने मालवली प्राणज्योत

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 9, 2021
in मनोरंजन
ADVERTISEMENT

बॉलिवूडमधून एक दुःख बातमी येतेय. राज कपूर यांचे धाकटे चिरंजीव आणि अभिनेते राजीव कपूर यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. राजीव कपूर हे रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषी कपूर यांचे छोटे बंधू आहेत. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना चेंबूरच्या इनलाक्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्याठिकाणी पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

रणधीर कपूर यांनी दिला वृत्ताला दुजोरा
रणधीर कपूर यांनी एका न्यूज वेबसाइटसोबत बोलताना म्हटले, “मी माझा धाकटा भाऊ आज गमावला आहे. आता तो या जगात नाही. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. मी आता रुग्णालयात आहे आणि त्याचं शव मिळण्याची वाट पाहतोय.” नीतू कपूर यांनीही सोशल मीडियावर राजीव यांचा फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाद्वारे राजीव यांना मिळाली होती ओळख
राजीव कपूर यांनी 1983 मध्ये रिलीज झालेल्या ‘एक जान हैं हम’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते, परंतु त्यांना खरी ओळख 1985 मध्ये आलेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटामुळे मिळाली. राजीव ‘नाग नागिन’, ‘अंगारे’ यासारख्या चित्रपटात अभिनेता म्हणून झळकले. या व्यतिरिक्त त्यांनी अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या राय स्टारर ‘आ अब लौट चले’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम ग्रंथ’ या चित्रपटाचे राजीव दिग्दर्शक होते.

7 महिन्यांपूर्वीच झाले ऋषी कपूर यांचे निधन
राजीव यांचे मोठे भाऊ ऋषी कपूर यांचे 7 महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. ऋषी यांनी दोन वर्षे कर्करोगाशी लढा दिला होता. अखेर 30 एप्रिल 2020 रोजी वयाच्या 67 व्या वर्षी मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.


ADVERTISEMENT
Previous Post

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण

Next Post

सोनगाव बंगला येथील खून व अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

Next Post

सोनगाव बंगला येथील खून व अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

ताज्या बातम्या

कोणत्याही प्रकारच्या सेन्सॉरशीपऐवजी स्व-वर्गीकरण करण्यावर भर : केंद्रीय मंत्री ना. प्रकाश जावडेकर

March 5, 2021

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोळकी ग्रामस्थांना संकलित करात 50% सवलत द्यावी; निवेदनाद्वारे मागणी

March 5, 2021

सकल जैन समाज संघटनेच्या माध्यमातून अनुप शहा यांच्या नेतृत्त्वाखाली विविध राज्यातील 108 अपंगांसह 400 लोकांना मिळाला सम्मेद शिखरजी यात्रेचा लाभ

March 5, 2021

सासरच्या जाचहाटास कंटाळून मुलीची आत्महत्त्या; मयत महिलेच्या आईची बारामती पोलीसांकडे तक्रार

March 5, 2021

फलटण – पंढरपूर रेल्वे मार्गाचा अहवाल जुन्या सर्वेक्षणानुसार करा : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 5, 2021

फलटण तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कामकाज उत्कृष्ट : सचिन रणवरे

March 5, 2021

भाडळीत स्मशानभुमीची मागणी; श्रीमंत संजीवराजेंकडे पाठपुरावा करणार : मोहनराव डांगे

March 5, 2021
केदारेश्वर मंदिरा शेजारील सिमेंट बंधारा

औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करु नये, शेतकऱ्यांची मागणी

March 4, 2021

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर, 28 तारखेला दिला होता राजीनामा

March 4, 2021

पोलिस प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, अपघात असल्याचे भासवण्यासाठी केली मोठी प्लॅनिंग

March 4, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.