स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रत्येक गावाचा विकास करून मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू – आ. शिवेंद्रसिंहराजे

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 19, 2021
in सातारा जिल्हा
ADVERTISEMENT

स्थैर्य, सातारा, दि.१९: सातारा व जावली तालुक्यातील जनतेने नेहमीच मला पाठबळ दिले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतही मतदार बंधू आणि भगिनींनी माझ्या विचाराच्या गटाची सत्ता आपापल्या गावामध्ये आणली. याबद्दल मी सातारा आणि जावली तालुक्यातील जनतेचा आभारी आहे. नेहमीप्रमाणे प्रत्येक गावातील प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असून नवनिर्वाचित सदस्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून गावाचा सर्वांगीण विकास करू आणि ग्रामस्थांचा विश्वास सार्थ ठरवू, असे आश्वासन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
               सातारा आणि जावली तालुक्यातील बहुताऊंश ग्रामपंचायतीवर आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवादीत सत्ता मिळवली. निकालानंतर विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी सुरुची येथे जल्लोष साजरा केला होता. निकालाच्या दुसऱ्या दिवशीही सातारा आणि जावली तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार, पॅनल प्रमुख आणि ग्रामस्थांनी सुरुची निवासस्थानी गर्दी केली. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विजयी उमेदवार, पॅनल प्रमुख आणि ग्रामस्थांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ते बोलत होते.
                 सकाळी ९ पासूनच विजयी उमेदवार, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी सुरुची येथे गर्दी करण्यास सुरुवात केली. सातारा व जावली तालुक्यातील शिवथर, नेले, सनपाने, बोरगाव, काळोशी, सर्जापूर, हमदाबाज, मायनी- वेळेढेंन, भिवडी, वेळे, सारखळ, शेळकेवाडी, सरताळे, इंगळेवाडी, सोनवडी, फडतरवाडी, बामणोली कसबे, शेंबडी, उंबऱ्याचीवाडी, आपटी, खोडद, करंडी, कण्हेर, पाडळी, सासपडे, राकुसलेवाडी आदी ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार, पॅनल प्रमुख, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विजयी उमेदवारांचा कंदी पेढा भरवून अभिनंदन केले. निवडणूक झाली, निकाल लागला आता कामला लागा. गटतट न मानता गावाचा सर्वांगीण विकास करा आणि मतदारांनी तुमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवा असे आवाहन करतानाच प्रत्येक गावच्या विकासासाठी नवनिर्वाचित सदस्यांना सर्वोतोपरी सहकार्य करू, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिला.

ADVERTISEMENT
Previous Post

WHO ने 13 देशांना कोरोनामुक्त घोषित केले

Next Post

मुंबईतील ७८% भाडेकरूंचे २०२१ मध्ये स्वतःचे घर खरेदी करण्याचे स्वप्न: नोब्रोकर

Next Post

मुंबईतील ७८% भाडेकरूंचे २०२१ मध्ये स्वतःचे घर खरेदी करण्याचे स्वप्न: नोब्रोकर

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी : श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर

March 6, 2021

जिल्ह्यातील चार टोळ्यातील 18 जण तडीपार जिल्हा पोलीस प्रमुखांची मोठी कारवाई : नागरिकांतून समाधान

March 6, 2021
औंध येथील उपोषणकर्ते ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांच्याशी चर्चा करताना तालुका कूषी अधिकारी राहुल जितकर व अन्य

औंध येथील ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांचे बेमुदत उपोषण पाचव्या दिवशी ही सुरू; तालुका कूषी अधिकार्यांची उपोषण स्थळी भेट

March 6, 2021

महिलेचा विनयभंग

March 6, 2021

धारदार शस्त्राने वार करून सव्वा लाखाचा ऐवज लुटला 

March 6, 2021

आईसाहेब महाराज पालखी सोहळ्याचे भाडळी बु.।। येथे स्वागत

March 6, 2021

महिला दिनानिमित्त बोरावके हिरो मध्ये सर्व स्कूटरवर भरघोस सूट

March 6, 2021

भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे; कॉलिटी कंट्रोल मार्फत तपासणी करूनच रस्त्याची कामे सुरू करावीत : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 6, 2021

बांध फोडल्याचा जाब विचारलाच्या मारहाणीत सहा जण जखमी

March 6, 2021

ताथवडा घाटात दरोडा टाकून लूटमार करणाऱ्या टोळी फलटण ग्रामीण पोलिसांकडून जेलबंद

March 6, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.