
दैनिक स्थैर्य । 13 जून 2025 । फलटण । येथील कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांचे चौधरवाडी, ता. फलटण येथे आगमन झाले. यावेळी कृषीकन्यांचे ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास कृषी सहायिका तृप्ती सुभाष शिंदे, सरपंच तुकाराम कोकाटे, माजी रामदास भोसले, ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर कार्यक्रम समन्वयक प्रा. नितीशा पंडित, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे, निलिमा धालपे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कन्या कुमारी जाधव, सृष्टी कांबळे, प्रणोती कांबळे, सानिका कदम, रोहिणी लडकत, श्रेया मलगुंडे, प्रतीक्षा काटकर, स्नेहा संजयकुमार यांनी शेतकर्यांचे अनुभव जाणून घेतले.
यादरम्यान विद्यार्थिनींनी शेतकर्यांना येणार्या अडचणी, शेतकर्यांचे जीवनमान, पीक पद्धती, नैसर्गिक संशोधने अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. शेतकर्यांना माती परीक्षण व पाणी परीक्षण, विविध पिकांवरील रोग व किडींचे व्यवस्थापन, हवामान, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल या कृषी कन्या शेतकर्यांना माहिती देणार आहेत. व ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत या कृषी कन्या शेतकर्यांच्या शेतीचा आणि दैनंदिन जीवनाचा अभ्यास करणार आहेत.