वीर धरण पूर्ण क्षमतेने भरले;गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता निरा नदीत तेहतीस हजार हजार चारशे क्युसेक्स विसर्ग


दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑगस्ट २०२२ ।लोणंद। सातारा व पुणे जिल्हयाच्या सीमेवर असणाऱ्या वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे वीर धरण पुर्ण क्षमतेत भरले असून गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता वीर धरणाचे सात दरवाजातून ३३ हजार ४५९ क्युसेस पाणी नीरा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती वीर धरण उपअभियंता विजय नलवडे यांनी दिली आहे.

वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधे नीरा खोऱ्यात असलेली भाटघर, नीरा देवधर, गुंजवणी ही सर्व धरणे गेल्या आठवडयापासुन पडत असलेल्या दमदार पावसामुळे भरण्याच्या मार्गावर आहेत वीर धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. वीर धरणातून गुरुवारी संध्याकाळी सह वाजल्यापासून वीर धरणाचे सात दरवाजातून ३३ हजार ४५९ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नीरा नदीमध्ये करण्यात येत आहे.

सातारा, पुणे, सोलापुर, जिल्हयाची लाईफलाईन असणाऱ्या नीरा नदीवर वीरधरण बांधण्यात आले असुन सततच्या पावसामुळे वीर धरणातुन नीरा नदी मधे २४ हजार ३८० क्युसेक्स पाण्याच्या विसर्ग करण्यात येत होता. वीर धरण पूर्ण भरले असल्याने पाण्याची आवक वाढल्याने संध्याकाळी सहा वाजता वीर धरणातून नीरा नदीत सात दरवाजे उचलून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे . धरण प्रशासनाच्या वतीने नीरा नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!