वावरहिरे ग्रामपंचायतीमध्ये आद्यक्रांतिकारक उमाजीराजे नाईक जयंती साजरी


 

स्थैर्य, वावरहिरे, दि. ०७ (अनिल अवघडे) : भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या सन 1857च्या  उठावाद्वारे इंग्रजांना सलग 14वर्षे सळो की पळो करुन सोडणारा व सर्व प्रथम  क्रांतीचे  स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या धातीचा आद्यक्रांतीकारक नरवीर उमाजीराजे नाईक यांची वावरहिरे ग्रामपंचायत कार्यालयात 229वी जयंत्ती साजरी करण्यात आली.त्यानिमित्ताने वावरहिरे गावचे सरपंच चंद्रकांत दादासो वाघ यांच्या हस्ते  प्रतिमेचे पुजन करुन  पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच सुरेशराव काळे ,ग्रां सदस्य संदिप अवघडे,मल्हारी जाधव, उत्तम अवघडे, विजय जाधव, सचिन जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!