स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

डाळींच्या विक्रीसाठी सरकार उचलणार हे मोठे पाऊल

Team Sthairya by Team Sthairya
November 28, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२८: कोरोना संकटाच्या काळात डाळींच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. भाज्या, डाळी, खाद्यतेल यासह जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही वेगाने वाढत आहेत. अनलॉक -5 लागू झाल्यानंतर मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठा फरक आल्यामुळे किंमती वाढल्याचे यामागील कारण आहे.

डाळी व भाजीपाल्याचे दर कमी करण्यासाठी सरकार काही पावलं उचलत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डाळींचे दर कमी करण्यासाठी सरकार खुल्या बाजार विक्री योजनेच्या माध्यमातून विकल्या जाणा-या डाळींवर सवलत देऊ शकते. प्राइज मॉनेटरिंग कमिटीने प्रति किलो 10 ते 15 रुपयांची सूट देण्याची शिफारस केली आहे.

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

नाफेड ओपन मार्केट स्कीम विक्रीतून डाळींचा लिलाव केला जातो. या स्कीममध्ये विकल्या जाणा-या डाळींवर सवलत दिली जाऊ शकते. सरकार सध्या राज्यं, निमलष्करी दलं आणि अंगणवाडीसारख्या ठिकाणी पाठविलेल्या डाळींवर सूट देते आहे. तसेच, घाऊक बाजारात तुरडाळीची किंमत 115 रुपये किलोच्या पलीकडे गेली आहे. दिल्लीसह अनेक बड्या शहरांमध्ये डाळींच्या किंमती 15 ते 20 रुपयांनी वाढल्या आहेत. गेल्या महिन्याभरापासून तूर डाळीमध्ये 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मूग आणि उडीद डाळ सुद्धा 10 टक्क्यांनी महागली आहे.

डाळींचा बफर स्टॉक 20 लाख टनापर्यंत वाढला

सरकारने डाळीचा बफर स्टॉक 20 लाख टन करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील डाळींच्या कमतरतेवर उपाय आणि वाढणारे मूल्य आटोक्यात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळाच्या समितीने डाळींचा बफर स्टॉक 20 लाख टनापर्यंत वाढवण्याच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. बफर स्टॉकसाठी देशांतर्गत बाजारातून 10 लाख टन डाळी खरेदी केल्या जातील, तर 10 लाख टन आयात केली जाईल.

बफर स्टॉकसाठी डाळींचे विशिष्ट प्रकार आणि प्रमाण देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील उपलब्धता आणि किंमतींच्या आधारे ठरविले जातील. जर यामध्ये काही बदल झाल्यास, त्यासाठी मान्यता घ्यावी लागेल. फूड कॉपोर्रेशन ऑफ इंडिया, नाफेड आणि इतर एजन्सी बाजारभावानुसार डाळी खरेदी करतील आणि बाजारभाव एमएसपीपेक्षा कमी असेल तर ते एमएसपीवर खरेदी केले जातील.

Related


Tags: देश
Previous Post

राष्ट्रवादीच्या या बंडखोर नेत्याची पक्षातून हकालपट्टी

Next Post

PM किसान योजना : ‘या’ तारखेपासून शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होईल 7 वा हप्ता, ‘या’ पध्दतीनं तपासा तुमचं यादीमधील नाव, जाणून घ्या

Next Post

PM किसान योजना : 'या' तारखेपासून शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होईल 7 वा हप्ता, 'या' पध्दतीनं तपासा तुमचं यादीमधील नाव, जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात ११ व्या फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद

August 11, 2022

पानीपत’पूर्वीच कॉंग्रेसला आत्मचिंतनाची गरज – हेमंत पाटील

August 11, 2022

नारळी पौर्णिमेच्या उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

August 11, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन निमित्त शुभेच्छा

August 11, 2022

दुःखद निधन – कै. बाळासाहेब जाधव

August 11, 2022

ऑडी इंडियाकडून नवीन ‘ऑडी क्यू३’ साठी बुकिंग्ज्चा शुभारंभ

August 11, 2022
सदाशिव पाटील

एन आय पी एम च्या चेअरमन पदी सदाशिव पाटील

August 11, 2022

देशाच्या सैनिकांच्या सन्मानार्थ म्युझिकल फ्लॅश मॉबचे आयोजन

August 11, 2022
कै रवींद्र पेंढारकर

दुःखद निधन – कै रवींद्र पेंढारकर

August 11, 2022

पेटीएम ऍपवर ‘लाइव्ह ट्रेन स्टेटस’ सुविधा

August 11, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!