• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

अण्णांच्या राळेगणसिद्धी ग्रामपंचायतीची बिनविरोध परंपरा पुन्हा सुरू, असे असेल जागावाटप

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 20, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, पारनेर, दि.२०: ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त
होणारे वाद, कटुता टाळण्यासाठी राळेगणसिद्धी ग्रामपंचायतीची निवडणूक
बिनविरोध करण्याबाबत राळेगणसिद्धी ग्रामस्थांमध्ये एकमत झाले. या
निर्णयामुळे पंधरा वर्षांपूर्वी खंडित झालेली बिनविरोध ग्रामपंचायत
निवडणुकीची परंपरा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय राळेगणसिद्धी येथील
विविध राजकीय गटांनी घेतला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गावातील
तरुण राजकीय कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या निर्णयावर शनिवारी शिक्कामोर्तब
केले.

आमदार नीलेश लंके
यांनी ‘ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा व गावाच्या विकासासाठी २५ लाखांचा
निधी मिळवा’ असे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत राळेगणसिद्धीचे
माजी सरपंच जयसिंग मापारी, उद्योजक सुरेश पठारे, माजी उपसरपंच लाभेश औटी,
सामाजिक कार्यकर्ते दत्ता आवारी यांंनी आमदार लंके यांची सुपे येथे भेट
घेतली. या वेळी झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत बिनविरोध करण्यावर एकमत झाले.
या बैठकीतील निर्णयाची माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देण्यात
आली.

पन्नास वर्षांपूर्वी
हजारे यांच्या नेतृत्वाखाली राळेगणसिद्धी येथे ग्रामपंचायत निवडणूक
बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार सात वेळा,
पस्तीस वर्षे राळेगणसिद्धीची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत होती‌. २००४
मध्ये मात्र बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीची परंपरा खंडित झाली. आता
पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू करण्याचा
निर्णय राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी घेतला आहे.

असे असेल जागावाटप

राळेगणसिद्धी
ग्रामपंचायतीमध्ये ९ सदस्य आहेत. त्यापैकी चार सदस्य उद्योजक सुरेश पठारे व
माजी उपसरपंच लाभेश औटी यांच्या गटाचे असतील. सुरुवातीची दोन वर्षे या
गटाकडे सरपंचपद असेल, तर माजी सरपंच जयसिंग मापारी यांच्या गटाचे पाच सदस्य
असतील. तीन वर्षे मापारी गटाकडे सरपंचपद असेल, असा समझोता झाला. दरम्यान,
राळेगणसिद्धीचा हा ट्रेंड राज्यात कोणी अमलात आणेल का, हे पाहणे
औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, असे असले तरी राजकीय पक्ष मात्र चढाओढीने
राजकारण करत असल्याचे सध्या तरी दिसत आहे. शिवसेनेने तर राज्यात कुठल्याही
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करू नये, असे आपल्या
जिल्हाप्रमुखांना बजावले आहे.

‘ब्रँड अॅम्बेसेडर’चे काम करू

ग्रामपंचायत
निवडणूक हा ग्रामविकासातील मोठा अडसर आहे. निवडणुकीनिमित्त वाद होतात.
कटुता निर्माण होते. त्याचा परिणाम गावाचा विकास खुंटण्यावर होतो. आमदार
लंके यांचे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न
स्तुत्य आहेत. राज्यात ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी आपण
ब्रँड अॅम्बेसेडर (विशेष दूत) म्हणून काम करण्यास तयार आहोत. 


– अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक.


Tags: राज्य
Previous Post

पोळने सोने व पैशाच्या हव्यासापोटीच खून केलेमाफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिची न्यायालयात साक्ष

Next Post

धवलसिंह मोहिते-पाटलांनी उडवले 20 ते 25 फुटांवरून बिबट्याचे मस्तक !

Next Post

धवलसिंह मोहिते-पाटलांनी उडवले 20 ते 25 फुटांवरून बिबट्याचे मस्तक !

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

साताऱ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष

मार्च 20, 2023

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप

मार्च 20, 2023

शेतीला चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

मार्च 20, 2023

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन

मार्च 20, 2023

राहुल गांधींची माफी आणि JPC च्या मागणीवरुन आजही संसदेत गदारोळ

मार्च 20, 2023

म्हणून मी वारंवार दिल्लीला जातो, यापुढेही जात राहणार; CM शिदेंनी केला दिल्लीवारीचा खुलासा

मार्च 20, 2023

महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल – मंत्री मंगल प्रभात लोढा

मार्च 20, 2023

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा – मंत्री संदिपान भुमरे

मार्च 20, 2023

इकोफायचा महिंद्रा सोलाराइझसोबत सहयोग

मार्च 20, 2023

‘चला जाणूया नदीला’ अभियान देशभर जावे – राज्यपाल रमेश बैस

मार्च 20, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!