• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार संवेदनशील! – माधव भांडारी

खरीप हंगामपूर्व कृषी आराखड्याचे प्रदेश भाजपाकडून स्वागत

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
मे 27, 2023
in लेख

दैनिक स्थैर्य । दि. २७ मे २०२३ । मुंबई । पावसाळा तोंडावर आलेला असताना राज्यातील शेतकऱ्यांच्या गरजांची जाणीव ठेवून शेतकऱ्यांच्या समस्या संवेदनशीलतेने सोडविण्याबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचे प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी स्वागत केले आहे. शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार खते, बीयाणे मिळावे यासाठी राज्य सरकारने आखलेल्या योजनांबरोबरच, पीक कर्जे देण्यास अडवणूक करणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी हिताचे धाडसी पाऊल उचलले आहे, असे श्री. भांडारी म्हणाले. भाजपा प्रदेश कार्यालयात गुरुवारी  झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , माध्यम विभाग सह संयोजक ओमप्रकाश चौहान  उपस्थित होते.

श्री. भांडारी यांनी या बैठकीतील शेतकरी हिताच्या महत्वाच्या निर्णयांची माहिती देऊन राज्य सरकारचे अभिनंदन केले. आगामी खरीप हंगामासाठी शेतकरी हितार्थ विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे, खते मिळावीत यासाठी कृषी विभागाची गुणवत्ता नियंत्रण पथके सज्ज होत आहेत. शेतकऱ्यांच्या कोणत्याही तक्रारींचे तातडीने निवारण केले जाणार आहे. यंदा प्रथमच शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शनासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांचीही कृषी खात्यास साथ मिळणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

बोगस बियाणे, आणि निकृष्ट दर्जाची खते विकणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करून प्रसंगी त्यांचे परवानेही रद्द करण्याचे तसेच शेतकऱ्यांची कृषी कर्जासाठी अडवणूक करणाऱ्यांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यामुळे  पीक कर्ज वितरणाला गती मिळेल व शेतकऱ्यास मोठा आर्थिक दिलासा मिळेल असा विश्वास श्री. भांडारी यांनी व्यक्त केला. जाणता राजा म्हणवून घेणाऱ्या शरद पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या आणि केंद्रीय कृषी मंत्रीपदाच्या काळातही असा धाडसी निर्णय घेतला गेला नव्हता.

यंदाच्या खरीप हंगामात लागवडीखालील अपेक्षित क्षेत्र ५८.२८ लाख हेक्टर राहणार आहे. यामध्ये कापूस पिकाखाली ४१.६८ लाख हेक्टर, तर सोयाबीन पिकाखाली ४९.११ लाख हेक्टर, भात पिकाखाली १५.९१ लाख हेक्टर, मका पिकाखाली ९.१० लाख हेक्टर, तर कडधान्य पिकाखाली २०.५३ लाख हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे. या खरीप हंगामासाठी १९.२३ लाख क्विंटल बियाण्याची गरज आहे. महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, खासगी उत्पादकांमार्फत २१.७७ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. ते आवश्यकतेपेक्षा ११३ टक्के अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बियाणेविषयक गरजांची पूर्तता करण्याची संपूर्ण तयारी राज्य सरकारने पूर्ण केली आहे, असे श्री. भांडारी म्हणाले.


Previous Post

महाराष्ट्र पोलीस देशात अग्रेसर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

शासन दिव्यांगांच्या द्वारी अभियान

Next Post

शासन दिव्यांगांच्या द्वारी अभियान

ताज्या बातम्या

रुग्णांना मार्गदर्शन करताना सुनंदा पवार व इतर

श्री श्री नेत्रालय बारामती येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

जून 8, 2023

फलटणमध्ये पालखी सोहळ्याचे बारकाईने नियोजन करा : जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी

जून 8, 2023

सुरवडीत साळुंखे – पाटलांच्या घरी मंत्री ना. विखे – पाटील

जून 8, 2023

नोंदणीकृत नसलेल्या दिंडीसाठी विशेष व्यवस्था करा : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील

जून 8, 2023

फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात संगीत कारंजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जून 8, 2023

श्रीराम कारखाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही : श्रीमंत संजीवराजे

जून 8, 2023

नवी मुंबई येथील बालाजी मंदिर राज्याचे नवे तीर्थस्थळ होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जून 8, 2023
अग्निशामक केंद्रा समोर वृषरोपण करताना अधिकारी व पदाधिकारी

पर्यावरण दिनी बारामती एमआयडीसी मध्ये वृषरोपण

जून 8, 2023
वृक्षारोपण करताना रोहिणी खरसे आटोळे व इतर

वडाच्या रोपट्याचे वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी

जून 8, 2023
कटफळ येथे वृषरोपण करताना मान्यवर

कटफळ मध्ये शिवराज्याभिषेक दिनी वृषरोपण

जून 8, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!