• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

छत्रपतींनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यातील राज्यकारभारात भारतीय लोकशाहीची बिजे

ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांचे प्रतिपादन

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
फेब्रुवारी 22, 2023
in फलटण

दैनिक स्थैर्य | दि. २२ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यातील राज्यकारभारामध्ये भारतीय लोकशाहीची बीजे रोवली होती. भारतीय स्वातंत्र्याची प्रेरणा ही छत्रपतींचीच होती. निःपक्ष निरपेक्ष राज्यपद्धतीतून त्यांनी राज्यकारभार केला असल्याचे सांगत आजच्या युवा पिढीने छ.शिवरायांचे विचार आत्मसात केले पाहिजेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांनी व्यक्त केली.

तांबेवाडी, ता.माळशिरस येथे शिवसाम्राज्य प्रतिष्ठान, जय शिवराय तरुण मंडळ व गणेश तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती महोत्सव व्याख्यानमालेत “छत्रपती शिवाजी महाराज आणि आधुनिक युवा पिढी” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.आढाव बोलत होते. यावेळी सरपंच संताजी बोडरे, सोसायटीचे चेअरमन संजय साळुंखे, माजी उपसरपंच तुषार भोईटे, शेतकरी गटाचे अध्यक्ष राजेंद्र तांबे, हरिभाऊ सकट, माजी सरपंच मेघा साळुंखे, बचत गटाच्या माधुरी तांबे, विलास भोईटे, सुभाष साळुंखे आदी प्रमुख उपस्थित होते.

छ.शिवाजी महाराजांनी स्वकर्तृत्वाने स्वराज्य निर्माण केले. तत्कालीन अनेक राजांनी वारसा हक्काने राज्य चालविले, मात्र छ.शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी राज्य चालविल्यामुळे रयतेला त्याकाळी स्वतःचे राज्य असल्याची भावना होती. तरुण वयात तोरणा किल्ला जिंकला असल्याचा पराक्रम व छ.शिवाजी महाराजांनी केलेले काम आधुनिक युवा पिढीला आदर्शवत असून युवकांनी महाराजांचे विचार आत्मसात केले पाहिजेत, अशी अपेक्षा प्रा.आढाव यावेळी व्यक्त केली.

प्रारंभी छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान, शालेय विद्यार्थिनी सई भोसले, स्वरा चंकेश्वरा, स्वाती भापकर यांनी छ.शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी सोलापूर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत दुग्धव्यवसाय प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या व्याख्यानमालेस बाळासाहेब तांबे, सागर तांबे, हनुमंत शिंदे, ज्ञानदेव पवार, ज्ञानदेव तांबे, सतीश वाघमारे, बाळासाहेब धाईंजे, नमो इंगवले, अभिजीत शिंदे, स्वाती तांबे, अशोक देवकर, किशोर साळुंखे, रणजित साळुंखे, रोहिणी भोईटे, संगीता तांबे, रुपाली शिंदे, स्वप्नील साळुंखे, किसान चव्हाण, संतोष शिंदे यांच्यासह प्रतिष्ठानचे व तरुण मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक पत्रकार विलास भोसले यांनी केले. आभार किशोर साळुंखे यांनी मानले.


Previous Post

फलटण आगार व्यवस्थापकपदी वासंती जगदाळे यांची नियुक्ती

Next Post

संत रोहिदास महाराज जगाला शांततेचा संदेश देणारा महान तप:स्वी – आमदार दीपकराव चव्हाण

Next Post
New Doc 02-21-2023 09.45

संत रोहिदास महाराज जगाला शांततेचा संदेश देणारा महान तप:स्वी - आमदार दीपकराव चव्हाण

ताज्या बातम्या

वाठार निंबाळकर व वाखरी हद्दीतील महावितरणच्या डी.पी.ची कॅपासिटी वाढवून लोकवस्तीत स्थलांतरित करावा

मार्च 21, 2023

सरकारी भरतीतील खाजगीकरणाचा जी.आर. तात्काळ रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा

मार्च 21, 2023

माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयागराजचे पथक २७ ते २९ या कालावधीत साताऱ्यात

मार्च 21, 2023

पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरेने करावीत

मार्च 21, 2023

‘लव्ह जिहाद’ पीडितांनी न घाबरता तक्रारी कराव्यात – नितेश राणे

मार्च 21, 2023

पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रंग शाहिरीचा कार्यक्रम

मार्च 21, 2023

गुढीपाडव्यापासून मिळणार ‘आनंदाचा शिधा’

मार्च 21, 2023
वडूज ता.खटाव येथील भूमी अभिलेख कार्यालय फलका नजीक पडलेल्या रिकाम्या बाटल्या

वडूजच्या भूमी अभिलेखा कार्यालयातील रिकाम्या बाटल्याचे मोजमाप करणे कठीण?

मार्च 21, 2023

शुभम नलवडे ठरले आळजापूर गावचे सर्वात कमी वयाचे ‘युवा सरपंच’; गावात जल्लोष

मार्च 21, 2023

रजनीकांत खटके यांच्या बेमुदत साखळी उपोषणास शिवसेना ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडी युतीचा जाहीर पाठिंबा

मार्च 21, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!