आरोग्याची दश सूत्री

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 14 मार्च 2025। फलटण । आरोग्य म्हणजे जेव्हा शरीर आणि मन व्यवस्थित असते म्हणजेच कोणताही रोग, आजार किंवा वेदना नसतात. असेही म्हणता येईल की जेव्हा शरीर आणि मन हे दोन्ही व्यवस्थित असतात आणि आपण आपली नेहमीची कामे नीट, व्यवस्थितपणे करू शकतो. आरोग्य किंवा तब्येत म्हणजे काय तर जेव्हा शरीर, मन आणि समाज हे तीनही व्यवस्थित असतात. आरोग्यासाठी शरीरही निरोगी हवे, मनाची उभारीही असावी आणि सामाजिक आरोग्याची स्थिती देखील चांगली असावी लागते. यासाठी आरोग्याची दशसूत्री अंमलात आणणे प्रत्येकाने गरजेचे आहे.

सर्वप्रथम प्रत्येकाने नित्यनियमाने 1/2 ते 1 तास स्वतःसाठी व्यायाम करा.
दररोज सकस व सात्विक आहार घ्यावा दोन आहारांच्या मध्ये कमीतकमी 6 तासांचे अंतर असणे गरजेचे आहे.

प्रत्येकाने भरपूर पाणी प्यावे म्हणजे साधारण दिवसातून 2 ते 3 लीटर पाणी पिणे गरजेचे असते. तसेच खळखळून हसल्याने सर्व स्नायूंना तजेला मिळतो. आपणास जेव्हा जमेल आणि जसे जमेल तसे दुसर्‍याला मदत करावी.

दररोज किमान 6 ते 7 तास शांत झोप आपल्या शरीराला ताजे तवाने करण्यास खूप मदत करते. सकारात्मकता ही आपली महत्वाची ढाल आहे. तिला अजिबात सोडू नका. रोज प्रार्थना करायला विसरू नका . निसर्गसृष्टीत प्रचंड ताकद आहे. आध्यत्मिकतेची कास सोडू नका . मी पणा गेल्याशिवाय समाधान लाभणार नाही. आपल्यामध्ये प्रचंड ऊर्जा आणि ताकद आहे हे विसरू नका . तुमच्यातील परिपूर्ण मी शोधायचा प्रयत्न करा , तो तुम्हाला नक्कीच सापडेल !!

तरी प्रत्येकाने ही दशसूत्री अंमलात आणली तर निरोगी आयुष्य मिळते. तसेच डॉक्टरांकडे जायला लागणारच नाही. सुदृढ, आरोग्यपूर्ण आणि समाधानी जीवन जगणे हीच असुदे आराधना !!
डॉ. प्रसाद जोशी, (अस्थीरोग शल्यचिकित्सक, जोशी हॉस्पिटल प्रा. लि. फलटण)


Back to top button
Don`t copy text!