
दैनिक स्थैर्य । दि. १७ जुन २०२५ । फलटण । एका प्रलंबित न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हे वॉरंट बजावण्यासाठी आले होते. त्यामुळे नागरिकांनी कोणताही गैरसमज करून घेवू नये, असे आवाहन जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील यांनी केले आहे.
दैनिक “स्थैर्य”ला विशेष माहिती देताना दुरध्वनी द्वारे साळुंखे – पाटील बोलत होते.
यावेळी बोलताना साळुंखे – पाटील म्हणाले की, एका प्रलंबित न्यायालयीन प्रकरणाच्या संदर्भात वॉरंट बजावण्यासाठी पोलीस आले होते. त्याबाबत पुढील प्रक्रिया ही आमचे विधिज्ञ करित आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी कोणताही गैरसमज करून घेवू नये.