श्रीमंत रामराजेंचा लोकसभा निवडणुकीतच महायुती सोडण्याचा निर्णय झालाय : माजी खासदार रणजितसिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. 7 आक्टोंबर 2024 । फलटण । श्रीमंत रामराजे यांचा लोकसभा निवडणूकीमध्येच महायुतीला सोडण्याचा निर्णय झालेला होता; फक्त बाहेर पडत असताना कुणावर तरी ठपका ठेवून जायचा म्हणुन रणजितसिंह नाईक निंबाळकरावर ठपका ठेवून बाहेर जाण्याचा निर्णय श्रीमंत रामराजे घेत असल्याची घणाघाती टीका माजी खासादार रणजितसिंह नाईक निंबाळक़र यांनी केली.

फलटण-बारामती रल्वे मार्गाची पाहणी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते.

कायम सत्तेत राहण्यासाठी श्रीमंत रामराजे पक्ष बदलतात

शरद पवारांची साथ सोडून अजित दादांच्यासोबत महायुतीत येत असताना श्रीमंत रामराजे यांना कोणत्या ना कोणत्या पदाची अपेक्षा होती त्यांच्यापेक्षा लहान असणार्‍या कार्यकर्त्यांना सुध्दा मंत्रीपद मिळाल्याने ते नाराज झाले होते व सत्तेमध्ये जावून सुध्दा पद मिळाले नसल्याने ते अजितदादांची साथ सोडून ते पवार साहेबांच्या बारोबर जाणार आहेत असे मत माजी खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केले.

महायुतीमध्ये येवुन रामराजेंनी व्यक्तीगत कामे मार्गी लावली

शरद पवारांची साथ सोडून अजितदादांच्यासोबत श्रीमंत रामराजे हे महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी आवश्यक असणारा निधी, स्वत:ची असणारी व्यक्तीगत कामे ही मार्गी लावून घेतली आहेत; त्यामुळे आता अजितदादांच्या सोबत राहुनसुध्दा काही एक फायदा नसल्याने श्रीमंत रामराजे अजितदादांची साथ सोडत आहेत असे मत सुध्दा यावेळी माजी खासदार रणजितसिंह यांनी यावेळी व्यक्त केले.

विधानसभेला पराभव निश्चित

श्रीमंत रामराजे हे नेहमी सत्तेत राहण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात; परंतू फलटण-कोरेगाव मतदार संघातील जनतेला त्यांच्या ढोंगीपणाचे राजकारण कळले असल्याने ते मायावतींच्या पक्षात किंवा अगदी समाजवादी पार्टीमध्ये गेले तरी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीत त्यांचा पराभव हा निश्चित असल्याचे मत माजी खासदार रणजितसिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!