• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

प्रवचने – संत हे भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
एप्रिल 9, 2023
in इतर, देश विदेश, प्रादेशिक, फलटण, बारामती, लेख, विशेष लेख, संपादकीय, सातारा जिल्हा

ज्याला सत्याचे ज्ञान झाले तो सर्वज्ञच बनला; आणि जे या सत्याला धरून राहतात ते संत होत. संत आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात, परंतु आपला अभिमान आड येतो, आणि आपण संतांना नावे ठेवतो. एकजण संतांना उद्देशून म्हणाला, “तुम्ही आमचे नुकसान करता; अपकार करणार्‍यावरही उपकार करायला सांगून आम्हांला मेषपात्र करता.” वास्तविक, आपल्या संतांनी कर्मांचा ढीग पाडला आहे, पण त्यांच्या आणि आपल्या कर्मांमध्ये फरक आहे. ‘राम कर्ता’ या भावनेने त्यांनी कर्म केले; आपण ‘मी’ पणाने करतो, म्हणून कर्म आपल्याला बंधनकारक बनते. संतांची कामगिरी कुणाला दिसत नाही; आणि आमची फक्त दिसण्यापुरतीच असते, त्यामुळे ती पुरी पडत नाही ! एखादा पुष्कळ ज्ञानी झाला, पण ते ज्ञान जर वृत्तीत उतरले नाही तर त्याचा काय उपयोग ? जगाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुखदुःखाच्या जाळयात सापडला नाही त्याच्याकडे जावे. तो साक्षित्वाने राहून जगापासून अलिप्तच राहतो. कर्म करूनही तो अलिप्त राहतो. आपण मात्र सुखदुःखात गुरफटून जातो. संताचे अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्याची शिव्यांची भाषासुद्धा न बोचणारी, किंबहुना आशीर्वाद रूपच ठरते. सत्पुरूष काही विद्वान्‌ नसतात. अती विद्वान्‌ मनुष्य कोणी सत्पुरूष झालेला ऐकिवात नाही. कुणी आठव्या वर्षीच घरातून निघून जातो, तर कुणी लग्नातून पळून जातो, तर कुणाला लिहायला वाचायलाही येत नाही, असे लोक सत्पुरूष झालेले आढळतात. संतांनी देह सोडल्यावर सुद्धा लोकांना त्यांचे अस्तित्व भासते.

लहान मूल बाहेर खेळत असते, परंतु मध्येच त्याला आईची आठवण होऊन तिच्याकडे धावते. याचा अर्थ असा की, मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण सतत असते. तसा भगवंताचा चटका, तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव, तशी त्याची निष्ठा, आपल्याजवळ पाहिजे. भगवंताची अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो. त्या स्थितीत त्याला कुणी संत भेटला की तो निवांत होतो. संत हे खरोखर आईसारखे आहेत. ते आपल्याला भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात. सर्व जगावर संतांचे उपकार आहेत. त्यांनी परमात्म्याला सगुणात आणले आणि तो आपल्याला सुसेव्य केला; परमात्म्याला आपलासा करून घ्यायला नामस्मरण हे सोपे साधन दिले; एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, असे सोपे सद्‌ग्रंथ निर्माण केले; आणि यथाशक्ती अन्नदान करणे हेच कलियुगात उत्तम साधन आहे असे सांगितले. या चार गोष्टी आचरणात आणायचा प्रयत्‍न ज्याने केला, त्याला काही कमी पडणार नाही; नेहमी समाधानच राहील.

जग संतांशिवाय असणे शक्य नाही; आम्हांला त्यांना ओळखता येत नाही.


Previous Post

संभाव्य टंचाई रोखण्यासाठी परिपूर्ण नियोजन करावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

Next Post

पाणी टंचाईत पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य द्यावे – दादाजी भुसे

Next Post

पाणी टंचाईत पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य द्यावे – दादाजी भुसे

ताज्या बातम्या

सातारच्या इतिहासाला सोन्याचा मुलामा देणार

मे 29, 2023

राजधानी मोहिमेच्या स्वागताला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार

मे 29, 2023

फसवणूक झालेल्या ऊस वाहतूकदार, कंत्राटदारांसाठी कोळकी येथील रेस्ट हाऊसमध्ये बैठकीचे आयोजन

मे 29, 2023

छत्रपती शिवरायांचे कार्य प्रेरणादायी – राज्यपाल रमेश बैस

मे 29, 2023

पशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती केली जाणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

मे 29, 2023

कामगारांची पारदर्शकतेने नोंदणी करून शासकीय योजनांचा गतीने लाभ द्यावा – मंत्री डॉ. सुरेश खाडे

मे 29, 2023

यूपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे यांची दिलखुलास कार्यक्रमात ३० मे रोजी मुलाखत

मे 29, 2023

सहकार मंत्र्यांच्या कार्यालयातून एक फोन अन्…शेतकऱ्याच्या खात्यात ५० हजारांचे अनुदान जमा

मे 29, 2023

मनरेगाचा आधार; मजुरांना नियमित रोजगार

मे 29, 2023

संस्मरणीय ठरेल अशा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मे 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!