व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनप्रश्नी शासनाचा वेळकाढूपणा; कोयनानगरात नागरिक आक्रमक


स्थैर्य,कोयनानगर, दि. २७ : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या मळे, कोळणे,पाथरपुंज या गावांतील बाधित जनतेने आदर्श पुनर्वसनासाठी कालपासून आंदोलन सुरू केले.

तीन गावांतील जनतेने आमचे आदर्श पुनर्वसन करा, यासाठीच 15 वर्षे प्रशासनाला सहकार्य केले आहे. देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आमच्या भूमीत होत आहे. याचा आम्हाला अभिमान वाटत असला तरी बाधितांना प्रशासनाने योग्य तो न्याय दिला पाहिजे.
-संजय कांबळे, समन्वयक, कृती समिती
अधिकाऱ्यांनी पुनर्वसनाबाबत दिरंगाई, वेळकाढूपणाचा निषेध करण्यासाठी या तीन गावांतील जनतेने आंदोलनाची ठिणगी टाकली आहे. दोनच दिवसांत या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर या ठिणगीचे रुपांतर वणव्यात होईल, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी.
-संजय पवार, अध्यक्ष, कृती समिती

Back to top button
Don`t copy text!