• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

शेती कायद्याविषयी पवारांच्या व्हायरल पत्रातील भूमिका राऊतांनी केली स्पष्ट

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 13, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, दि.१३: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज
19वा दिवस आहे. या आंदोलनावर तोडगा निघण्याचीही शक्यता आहे. मात्र, 18
दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी
पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

पंजाब
आणि हरयाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन म्हणजे देशातील शेतकऱ्यांच्या भावना
नाहीत हा अपप्रचार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून जे तीन कायदे मोदी
सरकारने आणले ते नक्की काय आहेत? ते कायदे म्हणजे शेतीचे थडगे व
शेतकऱ्यांचे मरण आहे असे ज्यांना वाटते, त्यांनी हा विषय लोकांना समजावून
सांगायला हवा.

पवारांनी तेव्हा शेतकरी हिताचाच विचार केला होता

शरद
पवार हे कृषिमंत्री असताना त्यांनी बाजार मंड्यांबाबत सुधारणा हवी का? अशी
भूमिका घेतली व तसे एक पत्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाठवले. भाजपने
काळ्या कायद्याच्या समर्थनासाठी श्री. पवार यांच्या या पत्राचा आधार घेतला.
पवारांचा आजचा विरोध हे ढोंग आहे असे ते म्हणतात. यावर माझे म्हणणे असे
की, पवारांनी 10 वर्षांपूर्वी शेती कायद्यातील सुधारणेची भूमिका मांडली
तेव्हा त्यात शेतकरी हिताचाच विचार होता. असे राऊतांनी सामनाच्या रोखठोक
सदरातून स्पष्ट केले आहे.

नवे धोरण आणि कायदे शेतकऱ्यांचे दिवाळे काढणारे

त्यावेळी
अंबानी-अदानी यांनी शेती क्षेत्रात प्रवेश केला नव्हता. बड्या
उद्योगपतींचा हा पसारा गेल्या सहा वर्षांत वाढला आहे. शेती मालाविषयी नवे
धोरण आणि कायदे शेतकऱ्यांचे दिवाळे काढणारे आहे. सर्व काही तोट्यातच चालले
आहे. शेती पिकविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात झालेली भरमसाट वाढ व
त्यामानाने मिळणारे कमी दाम यामुळे शेती ही किफायतशीर राहिलेली नाही, तर
धोकाच बनला आहे. असे शिवसेनेने म्हटले आहे.

शेतकऱ्यांचा त्यांनी फुटबॉल केला आहे

हिंदुस्थान
हा प्रामुख्याने खेड्यात आहे, शेती हा हिंदुस्थानी अर्थजीवनाचा कणा आहे ही
सर्व प्रमेयेच खोटी ठरवणारे आंदोलन पंजाब-हरयाणाचा शेतकरी करीत आहे.
शेतकरी दुसरा कोणता व्यवसाय करणार? किराणा मालाच्या व्यवसायातही बडे
उद्योगपतीच घुसले. शेतकरी खचला तर देशाचे सर्व अर्थशास्त्र व समाजव्यवस्था
कोसळून पडेल. मंत्री येतील व जातील, परंतु या देशाची शेतीच नष्ट झाली तर
देश भकास होऊन जाईल. चीनसारखा कम्युनिस्ट देश व अमेरिकेसारखा भांडवलशाही
देश आपल्या शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र सांभाळतो. अशा परिस्थितीत हिंदुस्थान
सरकारची ही अनास्था का? पंजाब-हरयाणाच्या शेतकऱ्यांचा त्यांनी फुटबॉल केला
आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांची याचना कवडीमोलाची ठरत आहे. शेतकरी
मरत आहे. त्याला कुणी वाचविणार आहे काय? असा सवालही शिवसेनेने केला आहे.


Tags: राज्य
Previous Post

रिपब्लिकच्या अडचणी वाढल्या; मुंबई पोलिसांकडून मोठी कारवाई, चॅनलच्या सीईओला केली अटक

Next Post

एका बूथवर दिवसभरामध्ये फक्त 100 जणांना देणार लस, लसीकरणासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

Next Post

एका बूथवर दिवसभरामध्ये फक्त 100 जणांना देणार लस, लसीकरणासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्थानक योजनेत फलटणचा समावेश : रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव; खासदार रणजितसिंह यांच्या प्रयत्नांना यश

मार्च 29, 2023

ग्रामदैवत फलटण, पुरातन श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहण हे फलटणच्या परंपरेला साजेसे काम : आ.श्रीमंत रामराजे

मार्च 29, 2023

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी ‘आयएफसी’ सोबतचा भागिदारी करार उपयुक्त ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे प्रतिपादन

मार्च 29, 2023

प्रवचने – पैशाच्या आसक्तित राहू नये

मार्च 29, 2023

कमी पाण्यात जास्तीच्या उत्पन्नाची हमी देणारी ‘प्रति थेंब अधिक पीक योजना’

मार्च 29, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मार्च 29, 2023

कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे संजय कोळी यांचे दीर्घ आजाराने निधन

मार्च 29, 2023

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात सातारा जिल्हा राज्यात अव्वल

मार्च 29, 2023

वझीरएक्सने पारदर्शकता अहवालाची चौथी आवृत्ती सादर केली

मार्च 29, 2023

मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पाचे काम आठ दिवसात मार्गी लावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

मार्च 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!