पंडित नाथराव नेरळकर यांनी संगीताचा समृद्ध वारसा दिला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली


स्थैर्य, मुंबई, दि.२९: पंडित नाथराव नेरळकर यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

देशातील विविध नामवंत पुरस्काराने गौरविलेल्या नाथरावांनी मराठवाड्यात संगीत प्रसाराचे केलेले काम कधीही विसरता येणार नाही. त्यांनी घडविलेले शिष्य त्यांच्या गायन आणि संगीताचा समृद्ध वारसा पुढेही चालवीत राहतील असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पंडित नेरळकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


Back to top button
Don`t copy text!