• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

वृत्तपत्र उद्योगाने मागितले प्रोत्साहन पॅकेज, कोविड -19 मुळे जाहिराती आणि वितरणाला मोठा फटका

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 13, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, दि.१३: इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे
(आयएनएस) अध्यक्ष एल. आदिमूलम यांनी केंद्र सरकारकडे वृत्तपत्र उद्योगाला
प्रोत्साहन पॅकेज देण्याची मागणी केली आहे. आयएनएस अनेक महिन्यांपासून
पॅकेजची अपेक्षा करत आहे. आयएनएसनुसार, कोविड-१९ मुळे जाहिराती आणि
वितरणाला मोठा फटका बसल्याने वृत्तपत्र उद्योग महसुलातील घटीच्या अभूतपूर्व
संकटाचा सामना करत आहे. अनेक प्रकाशने बंद झाली आहेत किंवा काही आवृत्त्या
अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्या आहेत. हीच स्थिती राहिली तर नजीकच्या
भविष्यात आणखी अनेक प्रकाशने बंद होतील. ८ महिन्यांत उद्योगाचे सुमारे
१२,५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे आणि वर्षअखेरपर्यंत ते १६,००० कोटी
रुपयांपर्यंत जाऊ शकते.

सर्वात
मोठ्या लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळल्यास गंभीर सामाजिक-राजकीय परिणामांची
कल्पना सहजपणे केली जाऊ शकते. त्यामुळे ३० लाख कामगार व कर्मचाऱ्यांवरही
परिणाम होईल. ते वृत्तपत्र उद्योगात पत्रकार, प्रिंटर, डिलिव्हरी व्हेंडर
आणि इतर अनेक रूपात काम करत आहेत. वृत्तपत्र उद्योग कोसळण्याचा विनाशकारी
परिणाम लाखो भारतीयांवरही होईल, त्यात कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय
समाविष्ट आहेतच. शिवाय त्याच्याशी जोडलेले उद्योग, प्रिंटिंग प्रेस,
न्यूजपेपर व्हेंडर आणि डिलिव्हरी बॉयसहित वितरणाच्या पुरवठा साखळीसह
इको-सिस्टिमवर परिणाम होईल. अनेक दशकांपासून उदरनिर्वाहासाठी ते या
उद्योगावर अवलंबून आहेत.

भारतीय
वृत्तपत्र उद्योगाने आव्हानात्मक काळात सत्यापित व तथ्यात्मक बातम्यांच्या
प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. तिची वेळोवेळी सुप्रीम कोर्ट,
कार्यपालिकेनेही प्रशंसा केली आहे. हा उद्योग संकटातून बाहेर पडण्याचा
पूर्ण प्रयत्न करत आहे आणि त्याचे लक्ष आता सरकारकडे आहे. उद्योगाला
अत्यावश्यक प्रोत्साहन पॅकेज द्यावे, अशी सरकारकडे मागणी आहे. त्यात
न्यूजप्रिंट, जीएनपी आणि एलडब्ल्यूसी पेपरवर उर्वरित ५ % कस्टम ड्यूटी रद्द
करावी, २ वर्षांचा टॅक्स हॉलिडे, शासकीय जाहिरातींच्या दरांत ५०% वाढ,
प्रिंट मीडियावर सरकारद्वारे केल्या जाणाऱ्या खर्चात २००% ची वाढ व बीओसी
तसेच राज्य सरकारांच्या माध्यमाने जारी केलेल्या जाहिरातींची प्रलंबित
देयके त्वरित अदा करणे यांचा समावेश आहे. कारण ही काळाची गरज आहे.


Tags: अर्थ विषयकदेश
Previous Post

महाविकासआघाडीचे पदवीधर आमदार ॲड. अभिजित वंजारी कोरोना पॉझिटिव्ह

Next Post

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू; विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

Next Post

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू; विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

सातारच्या इतिहासाला सोन्याचा मुलामा देणार

मे 29, 2023

राजधानी मोहिमेच्या स्वागताला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार

मे 29, 2023

फसवणूक झालेल्या ऊस वाहतूकदार, कंत्राटदारांसाठी कोळकी येथील रेस्ट हाऊसमध्ये बैठकीचे आयोजन

मे 29, 2023

छत्रपती शिवरायांचे कार्य प्रेरणादायी – राज्यपाल रमेश बैस

मे 29, 2023

पशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती केली जाणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

मे 29, 2023

कामगारांची पारदर्शकतेने नोंदणी करून शासकीय योजनांचा गतीने लाभ द्यावा – मंत्री डॉ. सुरेश खाडे

मे 29, 2023

यूपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे यांची दिलखुलास कार्यक्रमात ३० मे रोजी मुलाखत

मे 29, 2023

सहकार मंत्र्यांच्या कार्यालयातून एक फोन अन्…शेतकऱ्याच्या खात्यात ५० हजारांचे अनुदान जमा

मे 29, 2023

मनरेगाचा आधार; मजुरांना नियमित रोजगार

मे 29, 2023

संस्मरणीय ठरेल अशा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मे 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!