स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरळमार्गी, अभ्यासु कॉम्रेड चांद भाई शेख यांना अखेरचा लाल सलाम

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
सरळमार्गी, अभ्यासु कॉम्रेड चांद भाई शेख यांना अखेरचा लाल सलाम
ADVERTISEMENT


 

स्थैर्य, सातारा, दि. ०३ : पांढरा शुभ्र सदरा, पायजमा, डोक्यावर पांढरी टोपी आणि हातात काठी घेतलेले वयोवृद्ध ग्रहस्थ सातत्याने सातारच्या रस्त्यावर फिरत असत. सतत चौकस नजर घेऊन ते नेहमीच आपल्याला जे वाटतंय तो हेतू साध्य करत असत. कधी ते सातारच्या राजवाड्यावर असलेल्या सर्व श्रमिक संघाच्या कामगार युनियनच्या कार्यालयात कार्यकर्त्यांशी चर्चा करत असलेले दिसायचे. तर कधी तेथेच वाचन करीत असलेले दिसायचे. नेहमी फिरणे हा त्यांचा एक छंद होता. सातारच्या निवडक कार्यकर्त्यांच्या घरी ते नियमीत जात असत. अलीकडे त्यांच्या सातारा अर्कशाळा नगर मधील रहिवासी असलेल्या मुलाकडे राहायला असत. त्यावेळी पासून ते गेली साधारणपणे पंधरा ते सोळा वर्षे आमच्या घरी सकाळी नियमित येत असत. सकाळी पेपर वाचणे हा त्यांचा छंद. आमच्या घरी पेपर वाचून पूर्ण करत. त्याचबरोबर माझ्याकडे येत असलेली वैचारिक मासिके, साप्ताहिके ते वाचीत असत अनेक पुस्तके त्यांनी वाचली आहेत. जिवनमार्ग, लाल निशाण, युगांतर, परिवर्तनाचा वाटसरू, साप्ताहिक साधना, प्रबोधन ज्योती, सम्यक विद्रोही हि नियतकालिके त्यांना आमच्याकडे वाचायला मिळत.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

तर हे असे साधे वागणारे व्यक्तिमत्व म्हणजे कॉम्रेड चांद भाई शेख.

कॉम्रेड चांद भाई शेख यांचे संपूर्ण नाव चंदुलाल रसूल शेख. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील औंध येथील रहिवासी आपल्या मुलांना त्यांनी अतिशय खडतर अशा परिस्थितीतून शिकवले. त्यांची मुलेही त्याला जागली आणि त्यांनी उच्च शिक्षण घेतले. राष्ट्रसेवा दलाच्या खटाव येथील माजी आमदार केशवराव शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शाखेत ते नियमित जात असत. सातारा हुन मुंबईला ते आपल्या तरुण वयात गेले. तेथे त्यांनी सुरुवातीला मराठा या दैनिकात कंपोझिटरचे काम केले. अर्थात जुन्या मुद्रण प्रेस मध्ये त्यांनी खिळे जुळवण्याचे काम केलेले आहे. आचार्य अत्रे यांच्याशी त्यांचा त्यावेळी निकटचा संबंध आला. आचार्य अत्रे यांच्या गाडीवरही ते चालक वरून काम करीत असत. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्यावेळी झालेल्या आंदोलनात महाराष्ट्रभर शाहीर अमर शेख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, तसेच आचार्य अत्रे, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केलेल्या झंझावाती दौर्‍यात त्यांच्या वाहनाचे सारथ्य चांद भाई शेख यांनी केले आहे. शाहीर अमरशेख यांच्या बरोबर त्यांनी काही गीतेही सादर केली आहेत. त्यांनी स्वतः काही कवने लिहिली आहेत. हिंदी गीतकार कैफी आझमी अर्थात बाबा आझमी यांच्यासमवेत त्यांनी ईप्टामध्येसुद्धा कार्य केले आहे. परंतु त्यांनी अखेरच्या काळापर्यंत या मान्यवरांबरोबर मी होतो याचा जरूर अभिमान बाळगला मात्र त्याचा कधीही फायदा मात्र स्वतःच्या आयुष्यात घेतला नाही. मुंबईहून काही कारणाने ते पुन्हा सातारा येथे आल्यानंतर सातारा मध्ये एसटी चालक म्हणून सेवेत लागले. तेथे इंटक या कामगार संघटनेत कार्यरत होते. एसटीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते सातारा येथेच राहू लागले आणि साताऱ्यातील अनेक पुरोगामी व डाव्या चळवळीतील नेते व कार्यकर्त्यांच्या समवेत त्यांनी अनेक संघर्षात सहभाग नोंदवला आहे. अलीकडच्या काळात चाललेल्या आर्थिक धोरणांच्या बदलासंदर्भात ते नाराज होते आणि त्यांनी त्यासंदर्भात वेळोवेळी बोलूनही दाखवले आहे. विदर्भातले सुप्रसिद्ध अर्थ तज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांच्याशी त्यांनी अर्थकारणावर केलेली चर्चा महत्त्वाची होती.

वयाच्या पन्नाशीनंतर त्यांनी कुराण समजून घेण्यासाठी अरेबिक भाषा व्याकरणासहित शिकली आणि कुराणाचे वाचन त्यांनी एक अभ्यासक म्हणून केले. कुराणातील आयातींचा ते अर्थ सांगत असत. इस्लाम हा नेहमीच सत्याने जा असे सांगतो आणि सत्याच्या मार्गाने जाणाऱ्यांच्यासाठी हाफिताब आहे तो कोणत्याही एका धर्माचा नाही तर सर्व धर्मियांसाठी व मानवांसाठी हा कल्याणाचा मार्ग आहे असे त्यांचे मत होते.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या भारत सरकारने घेतलेल्या कर्जा संदर्भात व अन्य कर्जे, नोटाबंदी या संदर्भात ते नेहमीच काळजीने बोलत असत. देश आर्थिक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. अमेरिकेकडे देश गहाण पडलेला आहे. देशाने आता आम्ही काही कर्ज देवू नाही असे सांगून दिवाळखोरी जाहीर करून टाकावी व नव्याने चलन सुरू करावे असे त्यांचे मत होते. आणि हे ते आग्रहाने अनेकांना बोलून दाखवत असत. याविषयी तर ते अतिशय नाराजीने बोलत असत. कामगार युनियन म्हणजे दुकानदारी झालेली आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते. आंदोलन, मोर्चे, निदर्शने परिवर्तनाचा मार्ग नाही तर क्रांती झाली पाहिजे. आमच्याकडे किंवा कुणाकडे कधी गेले की ते नेहमी सांगत की डाव्या चळवळीची आंदोलने ही कुचकामी आहेत त्यांनी मार्ग बदलला पाहिजे व पर्याय नीट दिला पाहिजे. 

जेवणानंतर स्वतःचे ताट स्वतः धुणारे, स्वतःचे कपडे स्वतः धुणारे, शिस्तप्रिय व नीटनेटके राहणारे शेख चाचा आता पुन्हा घरी येवू शकणार नाहीत. अगदी दवाखान्यात नेत असताना सदरा, लेंगा स्वत:च घातला असे निसार या मुलाने सांगितले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

विजय मांडके, सातारा


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: सातारा
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्याधिकारी प्रसाद काटकर व त्यांच्या टीम मुळे रुग्णाला मिळाले त्वरित उपचार : अनुप शहा

Next Post

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये कॉन्स्टेबल पदाची भरती

Next Post
स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये कॉन्स्टेबल पदाची भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये कॉन्स्टेबल पदाची भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

बिल गेट्स बनले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी

बिल गेट्स बनले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी

January 17, 2021
स्टॅच्यू ऑफ यूनिटीपर्यंत पोहोचणे सोपे:मोदींनी 8 नवीन ट्रेन सुरू केल्या

स्टॅच्यू ऑफ यूनिटीपर्यंत पोहोचणे सोपे:मोदींनी 8 नवीन ट्रेन सुरू केल्या

January 17, 2021
”शिवसेनेला मतांची चिंता, त्यामुळेच नामांतराचा ‘सामना’, औरंगाबादच्या जनतेला विकास महत्वाचा”- बाळासाहेब थोरात

”शिवसेनेला मतांची चिंता, त्यामुळेच नामांतराचा ‘सामना’, औरंगाबादच्या जनतेला विकास महत्वाचा”- बाळासाहेब थोरात

January 17, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

संशयितांचे 72 अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु

January 17, 2021
हणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क भाग म्हणून घोषीत

हणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क भाग म्हणून घोषीत

January 17, 2021
Phaltan : सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे खात्रीशीर काम करण्यासाठी त्वरीत संपर्क साधावा : इंद्रनील मोटर्स

Phaltan : सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे खात्रीशीर काम करण्यासाठी त्वरीत संपर्क साधावा : इंद्रनील मोटर्स

January 17, 2021
फलटणकरांसाठी आनंदाची बातमी; बहुचर्चित फलटण – पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरु

फलटणकरांसाठी आनंदाची बातमी; बहुचर्चित फलटण – पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरु

January 17, 2021
राज्यासह देशावरील कोरोनाचे संकट लवकर जावूदे : आमदार दीपक चव्हाण; कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा फलटण येथे शुभारंभ

राज्यासह देशावरील कोरोनाचे संकट लवकर जावूदे : आमदार दीपक चव्हाण; कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा फलटण येथे शुभारंभ

January 17, 2021
तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात तब्बल 2 हजार 382 उमेदवार; काशिदवाडी व डोंबाळवाडी ग्रामपंचायत बिनविरोध

फलटण तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज

January 17, 2021
लिंब येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय 

ओंकार चव्हाण खून प्रकरणी अणखी तिघे जेरबंद

January 17, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.