कोल्हापूर : ठाकरे, राऊतांना भाटगिरी करणारे आवडतात, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, कोल्हापूर, दि.१६: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना जसे हवे तसे म्हटले तरच त्यांच्यासाठी चांगले, त्यांची चूक दाखवली तर त्यांना खपत नाही. मग पत्रकार पण जेलमध्ये जाणार, कंगना रनौैतचे आॅफिसही तोडले जाणार. त्यांना वाटते नुसती त्यांची स्तुती करावी. पण ग्रामीण भागात याला भाटगिरी म्हणतात. पण, आम्ही भाटगिरी करणारे नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी लगावला.

ते म्हणाले, चूक दाखवली तर महाराष्ट्राची बदनामी होते, मग चुका करू नका. सुशांतसिंह राजपूतप्रकरणी वेळेत एफआयआर दाखल का झाला नाही. तुम्ही एफआयआर दाखल केला नसल्याने सीबीआय चौकशी लागली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!