अत्याधुनिक युगात माणुसकी जपणे महत्वाचे

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे; अजितराव चव्हाण यांचा सेवापूर्वीनिमित्त सत्कार


बारामती – अजित चव्हाण यांचा सत्कार करताना दत्तात्रय भरणे व इतर मान्यवर.

स्थैर्य, बारामती, दि. 3 सप्टेंबर : अत्याधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये माणुसकी जपणे महत्त्वाचे असते अजितराव चव्हाण यांनी बँक ऑफ महाराष्ट्राचा लौकिक वाढवून माणुसकी जपली असल्याचे गौरवोद्गार कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले.

बँक ऑफ महाराष्ट्राचे विशेष सहाय्यक अधिकारी अजितराव चव्हाण यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव समारंभवेळी मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.

याप्रसंगी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकात, प्रतापराव पाटील, अविनाश गोफने, भाऊसाहेब सपकळ, दिलीप ढवाण, काशिनाथ जळक, दत्तात्रय रणवरे, अभिनेते डी. पी. दादा, अभिनेत्री जान्हवी किल्लेकर, सोनल नाईक व इतर मान्यवर, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

उत्कृष्ट व्यायामपट्टू, बँक अधिकारी व कुटूंबवत्सल म्हणून त्यांनी स्वतःचे वेगळेपण जपले आहे व त्यांचे सेवानिवृत्तीनंतर जीवन निरोगी जावो व समाजसेवक म्हणून ओळख निर्माण होणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

या प्रसंगी संकल्प ग्रुपच्या सामुदायिक सन्मान करण्यात आला. अभिनेते रामभाऊ जगताप यांनी ‘चांडाळ चौकटीच्या करामती’ या वेब सिरीजमधील डायलॉगवर उपस्थितांचे मने जिंकली विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या व विविध संस्था, संघटना यांनी सत्कार केला. सावळेपाटील यांनी सूत्रसंचालन केले. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अभिनेते वैभव चव्हाण यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!