
दैनिक स्थैर्य | दि. १२ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फडतरवाडी (बुध) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत फडतरवाडीमधील शेतकर्यांना शून्य ऊर्जेवर चालणारे शीतगृह यावर मार्गदर्शन केले.
भाजीपाला, फळे, फुले काढणीनंतर फळांमध्ये रासायनिक क्रिया होत असतात व पिकलेला माल लवकर सडून किंवा कुजून जातो, अशा पिकवलेल्या मालाला शीतगृहाची आवश्यकता असते. लहान शेतकर्यानं कोल्ड स्टोरेज आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते, याचा विचार करून त्यांच्यासाठी शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी करण्याचे प्रात्यक्षिक कृषीदूतांनी दाखविले. यावेळी कृषीदूत प्रतिक पाटील, निखिल ननावरे, भूषण पाटील, प्रतिक ननावरे, महेश जाधव, प्रथमेश निंबाळकर, श्रीतेज आवडे यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले. याप्रसंगी ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम, प्रा. नगरे मॅडम यांचे कृषीदूतांना मार्गदर्शन लाभले.