गोखळीची कोरोना रुग्ण संख्या शून्यावर


स्थैर्य, फलटण दि.16 : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील कोरोना रुग्ण संख्या शून्यावर आणण्यात यश आले असून येथील लोकसहभागातून सुरु करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षातील शेवटच्या 9 रुग्णानां डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी सोडण्यात आले आहे.

गोखळी ग्रामपंचायत आणि गावातील तरुणांनी एकत्र येऊन लोकसहभागातून दिनांक 13 मे पासून गावात कोरोना विलगीकरण केंद्र सुरु केले होते. या केंद्रात 74 रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोनामुक्त झाले. दिनांक 7 जून पासून गावातील कोरोना बाधितांची संख्या शून्यावर आली असून विलगीकरण केंद्रात उपचार घेणार्‍या शेवटच्या 9 बाधितांना डॉक्टरांच्या सल्ल्याने निरोप दिल्यानंतर विलगीकरण कक्षातही उपचारार्थ दाखल रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे.

याकरिता योगदान देत असलेल्या कोरोना योद्ध्यांचा, दररोज मोफत सेवा देणार्‍या गावातील डॉ. शिवाजीराव गावडे, डॉ. अमोल आटोळे, डॉ. नितीन गावडे, डॉ. विकास खटके, डॉ. सानिया शेख, आरोग्य सेविका लोंढे, आशा वर्कर सौ. दुर्गा आडके, अंगणवाडी सेविका सौ.सुरेखा आटोळे, यांचा आणि या विलिनीकरण कक्षासाठी सढळ हस्ते रोख आणि वस्तू रूपाने मदत करणार्‍या दात्यांचा कोरोना आपत्ती समितीच्या वतीने सरपंच सौ.सुमनताई गावडे यांचे हस्ते झाडं देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, बारामती सहकारी बँकेचे संचालक उद्धवराव गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा समितीचे सदस्य विश्‍वासदादा गावडे, श्रीराम बझारचे माजी संचालक मारुतराव गावडे, गोखळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज गावडे, डॉ.सोमनाथ वायसे, माजी सरपंच नंदकुमार गावडे, रमेश गावडे, पै.दीपक चव्हाण, सुनीलआप्पा गावडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागर गावडे, ओंकारगिरी महाराज, शेखर लोंढे, बांधकाम व्यावसायिक शांताराम गावडे, उपसरपंच डॉ. अमित गावडे, पोलिस पाटील विकास शिंदे, अभिजित जगताप, ग्रामविकास अधिकारी गणेश दडस, माजी उपसरपंच ज्ञानेश्‍वर घाडगे, अमोल गावडे, गावकामगार तलाठी प्रल्हाद गायकवाड, सुनील मदने, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते. कायक्रमाचे सुत्रसंचलन राधेश्याम जाधव तर आभार प्रदर्शन राजेंद्र भागवत यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!