श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्थेच्या सचिवपदी अमोल दोशी गुणवरेकर यांची निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १९ मार्च २०२४ | पंढरपूर | श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्थेच्या नूतन संचालक मंडळ निवडीमध्ये फलटणचे सुपुत्र डोंबिवलीस्थित अमोल श्रीकांत दोशी गुणवरेकर यांची सचिवपदी निवड झाली आहे.

संस्थेच्या वतीने पंढरपूर येथे आज संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे संचालक मंडळ पदग्रहण समारंभ श्रीराम मंगल कार्यालय येथे आयोजित केला होता.

यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून श्री. नमन धर्मेंद्र गांधी (पंढरपूर), उपाध्यक्ष श्री. तेजस प्रितम गांधी (अकलूज), सचिव श्री. अमोल श्रीकांत दोशी गुणवरेकर (मुंबई), सहसचिव श्री. तीर्थंकर णमोकर दोशी (भिगवण), खजिनदार श्री. रत्नकुमार राजकुमार फडे (अकलूज), सहखजिनदार श्री. आकाश मनोज गांधी (करमाळा), प्रसिद्धीप्रमुख श्री. देशभूषण भारत रणदिवे (वैराग), सहप्रसिद्धीप्रमुख श्री. अरिहंत सुनील फडे (श्रीपूर) यांची निवड करण्यात आली.

यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष यांच्या हस्ते भगवान महावीरांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. भगवान महावीरांच्या प्रतिमेस माल्यार्पण रसिकभाई कोठडिया, राजेश शहा, मरवडेकर, शाम पाटील, अतुल गांधी यांनी केले.

दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. लक्ष्मण आसबे, सी.ए. शशील गांधी, धर्मेंद्र गांधी, डॉ. शितल फडे, राजकुमार गांधी, डॉ. सूर्यकांत दोशी, संतोष फडे यांनी केले. सुमनश्री महिला मंडळ, पंढरपूर यांनी मंगलाचरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिहीरभाई गांधी प्रास्ताविकातून संस्थेमार्फत करण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. संस्थेच्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला.

पदग्रहण समारंभात डॉ. लक्ष्मण आसबे यांनी ‘जागर समृद्धीचा’ या विषयावर आपले विचार मांडले. ते बोलताना म्हणाले की, एखाद्या व्यक्तीने सर्वांगीण विकास केला तर तो माणूस समृद्ध मनुष्य असतो. माणूस म्हणून जन्माला येणं आणि मरताना देव म्हणून जाण्याची अनुभूती सर्वश्रेष्ठ व्यक्ती घडवते. धर्म, वारकरी परंपरा, चाणक्यनीती या माध्यमातून त्यांनी प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतला. मानवी जीवनात असणार्‍या चार आश्रमांबद्दल बोलत असताना त्यांनी कशा पद्धतीने काम केले पाहिजे, याबद्दल देखील सुंदर वर्णन सांगितले. प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणार व्याख्यान त्यांनी यावेळी केलं.

सी.ए. शशील गांधी यांनी ‘ऑनलाइनचे मृगजळ’ या विषयावर अभ्यासपूर्ण विचार मांडले. ऑनलाइनची सुरूवात कशी झाली, यापासून ते ऑनलाइन व्यवहाराचे तोटे उपस्थितांना समजावून सांगितले. शेअर मार्केट कशा पध्दतीने काम करते. त्याचे फायदे कशा पद्धतीने होऊ शकतात, यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.

मावळते अध्यक्ष प्रा. मनीष शहा यांनी २०२३-२४ या वर्षात संस्थेने केलेल्या कार्याचा आढावा वाचून दाखवला.

मिहीरभाई गांधी यांनी यावेळी नवनियुक्त संचालक मंडळास शपथ दिली. सातही जिल्ह्यामधून ४६ नूतन संचालकांनी शपथ घेतली. अरिहंत, देव, गुरू, शास्त्र यांच्या साक्षीने शपथ देण्यात आली. संस्थेचे कार्य मनापासून करून तन-मन-धनाने सर्व कार्यात सहभागी होऊन जैन धर्माची प्रभावना करण्याची शपथ दिली. नूतन संचालक मंडळात फलटणमधून पलाश दोशी गुणवरेकर, सिद्धेश शहा व मयूर शहा यांची निवड करण्यात आली. फलटणमधून बहुसंख्येने सभासद नोंदणी करण्यास प्रितम कोठारी, निलेश दोशी, यशराज गांधी यांनी प्रयत्न केले.

माजी संचालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन करण्यात आला. सन २०२३-२४ मध्ये फलटणमधून निलेश दोशी, प्रमोद शहा, मयूर शहा व राहुल शहा हे संचालकपदी होते.

या कार्यक्रमास डॉ. सतीश दोशी, अनिल जमगे, किरण शहा, दीपक व्होरा, राजकुमार गांधी, श्रीमती ताई शहा, डॉ. श्रेणिक शहा, हुकूमचंद दोशी, अजित माणिकशेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रथमेश कासार यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंढरपूर येथील कार्यकर्ते रोहित चंकेश्वरा, अगध गांधी व सहकारी यांनी कार्य केले.


Back to top button
Don`t copy text!