स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रस्ते, पाटबंधारे, पशुधन नुकसानीचे फेर आराखडे सादर करण्याची केंद्रीय पथकाची सूचना

Team Sthairya by Team Sthairya
December 26, 2020
in Uncategorized
रस्ते, पाटबंधारे, पशुधन नुकसानीचे फेर आराखडे सादर करण्याची केंद्रीय पथकाची सूचना
ADVERTISEMENT


स्थैर्य, नागपूर, दि. २६ : विभागात ऑगस्टमध्ये आलेला पूर गेल्या शंभर वर्षात उद्भवलेली आकस्मिक परिस्थिती होती. हानी अपरिमित आहे. मात्र केंद्राकडे पायाभूत सुविधा, कृषी, पशुधनाच्या नुकसानाची आकडेवारी सादर करताना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मदत निधीच्या निकषाप्रमाणे मागणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्राकडे अंतीम आराखडे पाठविताना रस्ते, पाटबंधारे व पशुधनाच्या नुकसानीची मुद्देसूद, संदर्भ व आराखड्यांसह आकडेवारी सादर करा, अशी सूचना केंद्रीय पथकाने आज केली.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये यासंदर्भात विभागीय बैठक झाली. 30, 31 ऑगस्ट 1 सप्टेंबर रोजी आलेल्या महापूराने पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या पाचही जिल्ह्यात प्रचंड नुकसान केले होते. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात हे पथक तीन दिवस पाहणी करून गेले होते. त्यानंतर राज्य शासनाकडून झालेली प्राथमिक मदत, पंचनामे,आर्थिक मदत लोकांपर्यंत पोहोचल्याची खातरजमा करणे व राज्य शासनाला पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असणारी अतिरिक्त मदत मंजूर करणे यासाठी केंद्र शासनाला आर्थिक शिफारसी करण्याकरीता आंतरविभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक पुन्हा दुसऱ्यांदा पाहणी करीता आले होते. २४ ते २६ डिसेंबर काळात विभागात प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आज विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केंद्राकडून हव्या असलेल्या मदतीच्या आर्थिक आराखड्यावर केंद्रीय पथकाशी चर्चा केली.

आजच्या बैठकीला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारी रमेश कुमार गंटा, यांच्या नेतृत्वात केंद्रीय वित्त विभागाचे व्यय संचालक आर. बी. कौल, केंद्रीय नियंत्रण विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे नागपूर येथील संचालक आर.पी.सिंग, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता तुषार व्यास उपस्थित होते. तर विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर,कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ जी. मो. शेख, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ब.श.स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही.डी.सरदेशमुख, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक रवींद्र भोसले, महावितरणचे अधीक्षक अभियंता अमीत परांजपे, अधीक्षक अभियंता नारायण आंमझरे ,पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक डॉ. कुंभारे,जीवन प्राधिकरण संतोष गव्हाणकर, उपायुक्त मिलिंद साळवे उपस्थित होते.

विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी यावेळी विविध विभागाकडून आलेले मदतीच्या मागणीचे आकडेवारीचे सादरीकरण केले. यामध्ये पाणीपुरवठा योजना, पाटबंधारे विभाग, ग्रामीण भागातील इमारती, समाज भवन, स्मशानभूमीतील सुविधा, सार्वजनिक स्वच्छतागृह, रस्ते, पूल, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत रस्ते, विद्युत विभाग व आरोग्य विभागातील झालेल्या नुकसानाची माहिती दिली.

विभागात पूर ओसरल्यानंतर तातडीने पंचनामे करून राज्य शासनाने आतापर्यंत विभागात १५ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार १७९.२९ कोटी रुपयांची मदत मंजूर केली.  पुरामध्ये झालेली जीवितहानी, पशुधनाचे नुकसान, पूरग्रस्त भागामधील पुनर्वसन, तात्पुरता निवारा, कृषी मालाचे नुकसान, पुरानंतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप,दुकानदारांना मदत अशा अनेक घटकांमध्ये पाचही जिल्हयात तातडीने निधी वाटप झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

तथापि, पुराचा तडाखा बसलेल्या भागांमधील  पाणीपुरवठा योजना, पाटबंधारे योजनेतील पायाभूत सुविधा उभारणे, रस्ते, पूल, वीज पुरवठा  व  आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मदत निधी निकषाप्रमाणे अंदाजे ही रक्‍कम १९१.६१ कोटी होते. मात्र विभागात करण्यात आले पंचनामे आणि प्रत्यक्ष केलेली पाहणी, यानुसार पायाभूत सुविधा, कृषी, घरांचे नुकसान, पशुधनाचे नुकसान, रस्त्यांचे नुकसान हे अपरिमित हानीत मोडणारे आहे. त्यामुळे केंद्र शासनाने ६३२.२६ कोटीची अतिरिक्त मदत करावी, यासाठी निकषाप्रमाणे १९१.६१ व अतिरिक्त मागणीनुसार ६३२.२६ कोटी असे एकूण ८१४.८८ कोटी रुपये मिळावेत, अशी शिफारस समितीपुढे करण्यात आली.

यावेळी समिती सदस्यांनी विभागात आलेल्या महापूर आकस्मिक गंभीर घटना असल्याचे मान्य केले. या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची नुकसान झाल्याचे पाहणीत पुढे आल्याचे सांगितले. तथापि, त्यांनी काही सूचना केल्या. यामध्ये क्षतीग्रस्त पुलांचे वाहतूक व्यवस्थेतील महत्त्व आणि त्यामाध्यमातून प्रभावित होणाऱ्या वाहतूक व्यवस्थेचे महत्त्व, रस्त्यांचे नुकसान सांगताना टप्प्याटप्प्याचे विश्लेषण, कृषी संदर्भातील अहवालामध्ये शेतकऱ्यांच्या आवश्यक मदती बाबतचे घटक निहाय विश्लेषण, तसेच रस्ते, पाटबंधारे, पशुधनासंदर्भात मागणी करताना केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन मदत निधीच्या निकषाप्रमाणे सर्व अहवाल तयार करून देण्याचेही त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्तांनी यानंतर अधीनस्थ अधिकाऱ्यांना समितीच्या सूचना प्रमाणे अहवाल सादर करण्याचे निर्देशित केले. यानुसार पुढील काही दिवसात केंद्र शासनाकडे मदतीची अधिकृत आकडेवारी पाठविली जाणार आहे.

तथापि, आजच्या बैठकीमध्ये केंद्रीय समितीने नागपूर विभागातील आपत्ती दरम्यान अधिकाऱ्यांनी पंचनामे करताना ठेवलेला मानवीय दृष्टिकोन, कोरोना काळात विपरीत परिस्थितीत तातडीने पोहोचलेली मदत आणि ज्या भागात नुकसान झाले त्या भागातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पूर्णतः हातचा गेला असताना रब्बीमध्ये मोठ्या प्रमाणात घेतलेले पीक याबद्दल कौतुक केले.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ADVERTISEMENT
Previous Post

पशुधनाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी रोगनिदानशास्त्रावर संशोधन गरजेचे – पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार

Next Post

6 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 345 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

Next Post
जिल्ह्यातील 82 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

6 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 345 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

ताज्या बातम्या

कोरोनाचे राजकीय पडसाद; इटलीच्या पंतप्रधानांचा राजीनामा

कोरोनाचे राजकीय पडसाद; इटलीच्या पंतप्रधानांचा राजीनामा

January 26, 2021
मोबाइल अ‍ॅक्शन गेम लाँच करुन अक्षय कुमार म्हणाला – शत्रुचा सामना करा, प्ले स्टोअरवर 50 लाखांहून अधिक झाले रजिस्ट्रेशन

मोबाइल अ‍ॅक्शन गेम लाँच करुन अक्षय कुमार म्हणाला – शत्रुचा सामना करा, प्ले स्टोअरवर 50 लाखांहून अधिक झाले रजिस्ट्रेशन

January 26, 2021
मराठी साहित्य संमेलनावर राष्ट्रवादीची छाप; स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड

मराठी साहित्य संमेलनावर राष्ट्रवादीची छाप; स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड

January 26, 2021
पद्मश्री पुरस्कार घोषणेनंतर माईंची पहिली प्रतिक्रिया : ‘मी अनाथांची माय झाले, तुम्ही गणगोत व्हा’;

पद्मश्री पुरस्कार घोषणेनंतर माईंची पहिली प्रतिक्रिया : ‘मी अनाथांची माय झाले, तुम्ही गणगोत व्हा’;

January 26, 2021
बाळासाहेबांच्या नावाला विरोध नाही; पण किती ठिकाणी द्यायचे हे सरकारने ठरवावे : देवेंद्र फडणवीस

बाळासाहेबांच्या नावाला विरोध नाही; पण किती ठिकाणी द्यायचे हे सरकारने ठरवावे : देवेंद्र फडणवीस

January 26, 2021
‘कठीण प्रसंगात तुम्ही साथ दिल्याबद्दल मी तुमचे शब्दात आभार मानू शकत नाही’- धनंजय मुंडे

‘कठीण प्रसंगात तुम्ही साथ दिल्याबद्दल मी तुमचे शब्दात आभार मानू शकत नाही’- धनंजय मुंडे

January 26, 2021
“पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का ? शेतकऱ्यांबाबत सरकारला कवडीची आस्था नाही” – शरद पवार

पवारांचे केंद्रावर टीकास्त्र:’अजूनही वेळ गेलेली नाही, केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा

January 26, 2021
पांडू’ या सिनेमाच्या घोषणेमुळे मराठी सिनेसृष्टीला मिळालं नवं चैतन्य

पांडू’ या सिनेमाच्या घोषणेमुळे मराठी सिनेसृष्टीला मिळालं नवं चैतन्य

January 26, 2021
तिसऱ्या तिमाहीच्या कंपनी निकालांनी दिले अर्थव्यवस्थेत सुधारणेचे संकेत

तिसऱ्या तिमाहीच्या कंपनी निकालांनी दिले अर्थव्यवस्थेत सुधारणेचे संकेत

January 26, 2021
लाल किल्ला परिसरातील उपद्रवानंतर अनेक भागातील इंटरनेट बंद, गृहमंत्री अमित शाहांनी बोलावली आपत्कालीन बैठक

लाल किल्ला परिसरातील उपद्रवानंतर अनेक भागातील इंटरनेट बंद, गृहमंत्री अमित शाहांनी बोलावली आपत्कालीन बैठक

January 26, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.