
फलटण येथील लक्ष्मीनगर परिसरातील सौ. अक्षता अतुल कोठाडिया यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी ५.३० वाजता फलटण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. 18 मार्च : फलटण येथील लक्ष्मीनगर (पीर दर्ग्याजवळ) येथे वास्तव्यास असणाऱ्या सौ. अक्षता अतुल कोठाडिया यांचे आज (दि. १८ मार्च) अल्पशा आजाराने निधन झाले आहे. श्री. अतुल जयकुमार कोठाडिया यांच्या त्या पत्नी होत.
त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ५.३० वाजता त्यांच्या पीर दर्ग्याजवळ, लक्ष्मीनगर येथील राहत्या घरापासून निघणार असून, फलटण येथेच त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत. कोठाडिया कुटुंबावर कोसळलेल्या या संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
