फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील ‘संवाद तक्रारदारांशी’ उपक्रमातून २६ अर्ज निकाली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ५ एप्रिल २०२४ | फलटण |
सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या सहभागातून ‘संवाद तक्रारदारांशी’ हा उपक्रम जिल्ह्यातील पोलीस उपविभागीय कार्यालय स्तरावर पार पाडण्यात येत आहेत. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय फलटण येथे काल झालेल्या ‘संवाद तक्रारदारांशी’ या उपक्रमात एकूण ८५ अर्ज दाखल झाले. या अर्जांच्या चौकशीअंती दखलपात्र गुन्हे ३, अदखलपात्र गुन्हे ७, प्रतिबंधात्मक कारवाई १५, एकूण १६ अर्ज चौकशीकरीता पाठविले असून उर्वरित ४ अर्ज इतर विभागाकडे वर्ग करण्यात आले. तसेच एकूण १४ अर्ज दाखल असून त्या अर्जांच्या चौकशीच्या अनुषंगाने सूचना देण्यात आलेल्या आहेत व २६ अर्ज निकाली काढण्यात आले.

सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत दर १५ दिवसांनी म्हणजेच महिन्यातील पहिल्या व तिसर्‍या गुरुवारी सकाळी १० ते १ या वेळेत ‘संवाद तक्रारदारांशी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिक, सैनिक व त्यांच्या नातेवाईकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही सातारा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

सदर उपक्रमामुळे तक्रारदार यांचे पोलीस विभागाशी संबंधित सर्व समस्या तात्काळ सोडविण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तक्रारदार यांना पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या ठिकाणी वारंवार जावे लागणार नाही व वेळेचा अपव्ययही होणार नाही.


Back to top button
Don`t copy text!