दहावी, बारावी मुख्य परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ; पालकांच्या खिशाला कात्री


स्थैर्य, सातारा, दि.29 ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांसाठीच्या मुख्य परीक्षा मैले शुल्कात पुन्हा एकदा वाढ केली आहे. या कागद, छपाई आणि प्रशासकीय खर्चात ळे वाढ झाल्याचे कारण देत मंडळाने ही एक शुल्कवाढ लागू केली असून मागील 4 ना वर्षातील शुल्कवाढीचा क्रम पाहता न विद्यार्थी व पालकांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.

एकीकडे सर्वसामान्य पालक महागाईने त्रस्त झाले असतानाच आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने त्यात जास्तीची भरघातली आहे. सलग चौथ्या वर्षीही दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कामध्ये वाढ केली आहे. मार्च 2026 मध्ये होणार्‍या परीक्षेसाठी सुधारीत शुल्क आकारले जाणार आहे. दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांसाठी असलेले परीक्षा शुल्क आता 470 रुपयांवरून 520 रुपये करण्यात आले आहे. म्हणजेच थेट 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीचे परीक्षा शुल्कही वाढवण्यात आले आहे. आता शुल्क 490 रुपयावरुन 540 रुपये करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी प्रशासकीय शुल्क 20 रुपये असून गुणपत्रिका लॅमिनेशन शुल्क 20 रुपयेआहे. तसेच प्रात्यक्षिक शुल्क 200 रुपये आकारण्यात येत आहे. शिक्षण मंडळाने केलेल्या शुल्कवाढीमुळे सर्वसामान्य पालकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

सातारा जिल्ह्यात मे महिन्याच्या उत्तरार्धात झालेल्या पावसाने शेतकर्‍यांना सावरण्यास वेळच दिला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या. यानंतर परतीच्या पावसानेही फलटण व माण तालुक्यांना तडाखा दिला आहे. खरीप हंगाम वाया गेला. फळबागा उद्ध्वस्त, पशुधन वाहून गेले. अशा अस्मानी संकटानंतरही पालकांवर परीक्षा शुल्क वाढीचा बोजा पडणार आहे.


Back to top button
Don`t copy text!