
दैनिक स्थैर्य । दि. १३ जून २०२२ । सातारा । मंगळवार पेठ येथील युवकाने रात्री घरातच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. समर्थ मंदिर चौक परिसरातील बालाजीनगर व सातवीच्या पिछाडीला असणाऱ्या झोपडपट्टीत ही घटना घडली आहे. रवी प्रकाश पवार वय 29 असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. मात्र रवी हा मजुरीची छोटीमोठी कामे करत होता नेहमीप्रमाणे तो रात्री येऊन जेवण करून झोपी गेला. मध्यरात्री कॉटवरच आढ्याला साडीचा गळफास तयार करून त्याने आपली जीवनयात्रा संपली. सकाळी त्याच्या पत्नीच्या हा प्रकार निदर्शनास आला. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाणे येथे झाली आहे या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.