फलटण तालुक्यातील जनतेला व कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : माजी खासदार रणजितसिंह; राज्याच्या अर्थसंकल्पात 10 कोटींची विकासकामे मंजूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 11 जुलै 2024 | फलटण | नुकताच झालेल्या राज्य अर्थसंकल्पामध्ये फलटण तालुक्यातील ४५ गावांमध्ये १० कोटी रुपयांचे रस्ते, पुल, संरक्षक भिंत, मोरीचे बांधकाम, इत्यादी कामांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून निधी मंजूर झाला आहे. तालुक्यातील जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पुर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार असून विधानसभा मतदारसंघातील जनतेला व कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पुढील काळात राज्य सरकार व केंद्र शासनाच्या वतीने जेवढा निधी आणता येईल तेवढा आणला जाईल; अशी माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

यावेळी बोलताना रणजितसिंह म्हणाले की; फलटण तालुक्यातील जनतेने माझेवर भरभरून प्रेम केले आहे. या तालुक्यातुन १७ हजार मताचे मताधिक्य लोकसभेला मला दिले आहे. त्या ऋणातून मी उतराई होऊ शकत नाही. या तालुक्याच्या विकासासाठी जी कामे यापूर्वी मंजूर केलेली आहे ती पुर्ण करणे व भविष्यात येणाऱ्या सर्व अडचणीसाठी या तालुक्यातल्या जनतेशी कायम त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. मी मंजुर केलेल्या पाणी योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मी प्रशासन ला दिले आहेत.


Back to top button
Don`t copy text!