
दैनिक स्थैर्य | दि. 20 एप्रिल 2025 | फलटण | महाराष्ट्रातील भक्तिपरंपरेचा एक महत्त्वाचा स्तंभ असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्री स्वामी समर्थ मंडळ, अहिल्यानगर गजानन चौक फलटण येथे रविवार दि. २० एप्रिल २०२५ पासून शनिवार दि. २६ एप्रिल २०२५ पर्यंत सात दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी विविध भक्तिगीत, अभंग, वाचन-साधना तसेच रथयात्रा, आरती, अभिषेक यांसारख्या पारंपरिक विधींचा समावेश आहे.
रोज सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत मल्हारी सप्तशक्ती, श्री नवनाथ भक्तीसार, श्री दुर्गा सप्तशी, श्रीमद्भागवत भक्तीसार, श्री स्वामी चरित्र सारामृत, भैरवचंडी यांसारखे विविध धार्मिक ग्रंथांचे पठण आणि भक्तिपर सेवा घेतली जाईल. या सात दिवसांच्या या भक्तिमय कार्यक्रमांतून स्वामी समर्थांच्या जीवनतत्त्वांचा आणि शिकवणींचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विशेषतः शनिवार दि. २६ एप्रिल २०२५ हा पुण्यतिथीचा मुख्य दिवस असून सकाळी ५ ते ७ वाजता श्री नां अभिषेक होणार आहे. त्यानंतर सकाळी ७:३० ते ८ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थांची आरती संपन्न होईल. सकाळी ९:१५ वाजता श्री स्वामी समर्थांच्या रथाचे पूजन होऊन तो ग्रामप्रदीक्षणासाठी मार्गस्थ होणार आहे. हे ग्रामप्रदीक्षण संपूर्ण परिसरात भक्तांमध्ये आध्यात्मिक आनंद आणि भक्तीची विण आहे.
दुपारी १२ वाजता रथप्रदीक्षणानंतर श्री स्वामी समर्थांची आरती व नैवद्याचे आयोजन असणार आहे व दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत स्वामी चरित्र वाचनाने भक्तांना अध्यात्मिक मार्गदर्शन केले जाईल. सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाचे भजन रंगणार असून रात्री ७:३० वाजता महाआरती होऊन महाप्रसाद वाटप करण्यात येईल. रात्री १० वाजता श्री स्वामी समर्थ एकतारी भजनी मंडळ फलटण यांच्या भजनांनी या पुण्यतिथी उत्सवाचा समारोप होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी व भक्तीमय आनंद घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, अहिल्यानगर, गजानन चौक यांनी सर्व श्रद्धाळूंना आवाहन केले आहे. या सात दिवसीय पुण्यतिथी उत्सवामुळे स्थानिक तसेच परिसरातील भाविकांमध्ये आध्यात्मिक एकात्मता व भक्तीची भावना दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन फलटणमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिवर्षी होत असून या वर्षीही या उत्सवात भक्तीची उर्मी पाहायला मिळणार आहे. भक्तांसाठी हा कार्यक्रम अध्यात्मिक उन्नतीसाठी आणि संस्कृती जपण्यासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे.