मराठी माणसाचा प्रखर लढा रक्त आणि अश्रूतून संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला – प्रा डॉ उदय निरगुडकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑगस्ट २०२२ । मुंबई । मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे यासाठी स्वाभिमान आणि अस्मितेचा प्रखर असा संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला गेला, त्यासाठी मराठी माणसाचे अश्रू आणि रक्त सांडले गेले त्यातूनच निर्माण झालेली संयुक्त महाराष्ट्राची सुंदर फुले आजच्या पिढीला वेचता आली. ते भाग्य आपल्याला आचार्य अत्रे आणि त्यांच्या समवेत असलेल्या समकालीन नेतृत्वाच्या त्यागातून आणि संघर्षातून मिळाले आहे. आचार्य अत्रे यांच्या जयंतीचे हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. शासनासह प्रत्येक मराठी जणांनी वर्षभर अत्रेंचे स्मरण करणे आपले सर्वांचे उत्तरदायित्व आहे. असे आवाहन प्रा डॉ उदय निरगुडकर यांनी केले.

आचार्य अत्रे स्मारक समिती आणि मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई च्या वतीने आचार्य अत्रे यांच्या१२५ व्या जयंती निमित्त वरळी नाका येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली, याप्रसंगी आचार्य अत्रे समितीच्या अध्यक्षा ऍड आरती सदावर्ते-पुरंदरे, नगरसेवक अरविंद भोसले, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे उपस्थित राहणार होते. कुटुंब रंगलय काव्यातचे प्रा विसुभाऊ बापट, वृत्तनिवेदक विजय कदम, डॉ रवींद्र आवटी, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक विजय ना कदम, राजन देसाई, श्रीकांत मयेकर, उद्योजक अमर तेंडुलकर, कुमुदिनी बोराडे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अत्रे भक्त सहस्त्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!