मंदिर बंद, उघडले बार : उद्धवा धुंद  तुझे सरकार


 

स्थैर्य, फलटण दि. १३: राज्यातील मंदीरे खुली करण्यासाठी भाजपाच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मारुती मंदिर, कोळकी येथे आंदोलन करण्यात आले, महाविकास आघाडी सरकारच्या धोरणांचा निषेध करुन घोषणा देण्यात आल्या. मंदीरे उघडलीच पाहिजेत, नवरात्रौत्सवाला परवानगी मिळालीच पाहिजे अशा घोषणा देऊन महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत दादा पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या सुचनेनुसार गेली ६ महिने राज्यातील मंदिरांचे दरवाजे उघडावेत यासाठी अनेकवेळा मागणी करण्यात आली, राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केले तरीही महाराष्ट्र सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही या उलट राज्यात मदिराचे बार उघडण्यात आले. संतांची कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकारने बार सुरु आणि मंदिरे बंद असे काळे चित्र उभे केले आहे या काळ्या निर्णयाविरोधात मंदिरे तातडीने उघडावी यासाठी सर्व अध्यात्मिक संघटना, साधुसंत यांनी आज एक दिवसाचे उपोषण व आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

याचाच एक भाग म्हणून मंदीर खुली करण्यासाठी फलटण भाजपाच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वरीलप्रमाणेे आंदोलन छेडण्यात आले त्यामध्ये तालुकाध्यक्ष विष्णुपंत लोखंडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, पै. बाळासाहेब काशिद, युवा नेते संदिप नेवसे, यशवत जाधव, गणेश घाडगे, रणजीत जाधव, रामभाऊ शेंडे, राजेंद्र पोरे, राजेंद्र जगदाळे, प्रदीप भरते, गणेश वाकोडे, पार्थ पोरे अभिजीत शिंदे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!